मुंबई : छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, सुशोभीकरण आणि पर्यटनदृष्टया विकास करण्यासाठी 23 कोटी रुपयांचा निधी सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली. या निधीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्टय़ा विकास करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.
याचाच एक भाग म्हणून शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडकिल्ल्याचे जतन, संवर्धन, सुशोभीकरण आणि या परिसराचा पर्यटनदृष्टय़ा विकास करण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
या निधीतून अंबरखाना, राजवाडा आणि त्याला जोडून असलेल्या भागाचे पुनरुज्जीवन, गुंफांचे पुनरुज्जीवन, पर्यटकांसाठी सोयी-सुविधा, दिशादर्शक आणि मार्गदर्शक चिन्हे, बागकाम, शिवनेरी प्रदक्षिणा मार्गाची सुधारणा, वरसुबाई मंदिर ते पद्मवती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा, शिरोली बु. ते तेजेवाडी रस्त्याची सुधारणा आदी विविध रस्त्यांची सुधारणा करणे, शिवसंकुल येथे पर्यावरण पर्यटन इत्यादी कामे केली जाणार आहेत.
Read Also :
- ‘काँग्रेसला कोणीही संपवू शकत नाही, पवारांनी दिलेली वाट तात्पुरती’
- ‘अंगात नुसतं विदर्भाचं रक्त असून चालत नाही, तर…’; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- … तर मी आत्महत्या करेन, शेतकरी नेत्याचा सरकारला इशारा
- ‘तुमच्या सरकारला जमलं नाही ते काम आम्ही नक्कीच करु, फक्त…’, काँग्रेसचा फडणवीसांवर निशाणा
- वर्षभरात बालभारती स्वतःचे शैक्षणिक चॅनेल सुरु करणार, शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती