पुणे : पुढील वर्षभरात बालभारती स्वतःचे शैक्षणि चॅनेल सुरू करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) संस्थेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त व किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, मनोरंजन केंद्र, बालभारती चा आज ५४ वा वर्धापन दिन व मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त बालभारती, पुणे येथे भव्य समारंभ आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले. (१/३) pic.twitter.com/S5ixmFQCFQ
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 27, 2021
विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाने सुसज्ज तीन स्टुडिओ उभे केले आहेत. तसेच राज्यातील अनेक शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व्हिडिओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात. वर्षभरात बालभारती स्वतःचे शैक्षणि चॅनेल केले जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
राज्यातील इ. १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ४२६ तज्ञ समुपदेशकांच्या सेवा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर यादी https://t.co/TiE9kH9UxK वर उपलब्ध आहे. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @scertmaha
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 27, 2021
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे यु-ट्युब-फेसबुक लाईव्ह आदी साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेश करण्यासाठी 426 तज्ज्ञ समुपदेशक उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
Read Also :
- ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारानंतर दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार
- भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख ? गृहमंत्र्यांचा कारवाईचा इशारा
- पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला लवकरच मिळणार मान्यता, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे आश्वासन
- ‘…तेव्हा आशिष शेलार तुम्ही झोपले होते का ?’ पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचे पुराव्याने उत्तर
- अमित शहांचा राजीनामा घ्या, दिल्लीतील हिंसाचारानंतर काँग्रेसची मागणी