नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर परेड काढण्यात आली होती. मात्र यावेळी मोठा हिंसाचार झाल्याचे पाहण्यास मिळाले. या हिंसाचारानंतर आता शेतकरी संघटनांमध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे.
हिंसाचारानंतर दोन शेतकरी संघटनांनी या आंदोलनातून माघार घेतल्याचे स्पष्ट केले असून, यात राष्ट्रीय किसान मजदूर संघ आणि भारतीय किसान यूनियन (भानू) यांचा समावेश आहे.
I am deeply pained by whatever happened in Delhi yesterday and ending our 58-day protest: Thakur Bhanu Pratap Singh, president of Bharatiya Kisan Union (Bhanu) at Chilla border pic.twitter.com/5WNdxM9Iqo
— ANI UP (@ANINewsUP) January 27, 2021
भारताचा ध्वज, त्याची प्रतिष्ठा आणि मर्यादा राखणं हे सर्वांचं काम आहे. ध्वजाच्या प्रतिष्ठेला कुणी धक्का पोहोचवला असेल तर तशी कृती करणारे चुकीचे आहेत आणि ती कृती करू देणारेही चुकीचे असल्याचे राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्ही.एम. सिंग यांनी म्हटले.
Correction: I can't carry forward protest with someone whose direction is different. I wish them best but VM Singh & Rashtriya Kisan Mazdoor Sangathan* are withdrawing from the protest: VM Singh, Rashtriya Kisan Mazdoor Sangathan & All India Kisan Sangharsh Coordination Committee pic.twitter.com/kXC70UvRWZ
— ANI (@ANI) January 27, 2021
दोन शेतकरी संघटनांनी माघार घेतल्याने शेतकरी आंदोलनासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. संघटनांनी माघार घेतल्यानंतर काही शेतकऱ्यांनी घरी परतण्याची देखील तयारी केली आहे.
दरम्यान, आता शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार हे कृषी कायद्यांबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख ? गृहमंत्र्यांचा कारवाईचा इशारा
- पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला लवकरच मिळणार मान्यता, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे आश्वासन
- ‘…तेव्हा आशिष शेलार तुम्ही झोपले होते का ?’ पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचे पुराव्याने उत्तर
- अमित शहांचा राजीनामा घ्या, दिल्लीतील हिंसाचारानंतर काँग्रेसची मागणी
- ‘बेळगाव सोडा, मुंबईवर सुद्धा आमचाच हक्क’, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याचे अजब वक्तव्य