बेळगाव : बेळगाव सीमाप्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील विवादित भाग हा केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, अशी मागणी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मुख्यमंत्री ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आता कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी अजब वक्तव्य करत थेट मुंबईवर दावा ठोकला आहे.
मुंबईवर हक्क सांगतानाच, मुंबईला केंद्रशासिक प्रदेश म्हणून जाहीर करावे, अशी अजब मागणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली आहे.
बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचाच भाग आहे. मुंबईवर आमचा हक्क आहे, असे वक्तव्य करतानाच मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे सवदी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, डॉ. दीपक पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर लिहिलेल्या ‘संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील वादग्रस्त भागच केंद्रशासित करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकच्या मंत्र्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Read Also :
- ‘देवेंद्रभाऊ, ज्या मेट्रोतून तुम्ही प्रवास केला त्याची सुरुवात काँग्रेसने केली’, सत्यजित तांबेंचा फडणवीसांना टोला
- ‘ती’ 2 नावे घेताना काहींना अॅलर्जी होते, शरद पवारांचा विखे पाटलांवर निशाणा
- ‘काँग्रेसने शेतकऱ्यांना हिंसेसाठी भडकवले’, केंद्रीय मंत्र्याचा गंभीर आरोप
- ‘महाविकास आघाडीचा गोंधळ पाहता…’, दिल्ली मेट्रोत बसून फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा
- … त्यानंतरच चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा विचार करू – वर्षा गायकवाड