नवी दिल्ली : दिल्लीत कृषी कायद्याविरोधात काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागले होते. येथील हिंसाचारात शेकडो पोलीस जखमी झाले, तर एका आंदोलनकर्त्याचा देखील मृत्यू झाला आहे. आता यावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे.
काँग्रेसकडून ही स्थिती व्यवस्थित हातळली नाही म्हणून मोदी सरकारला जबाबदार धरले जात आहे. तर दुसरीकडे भाजपच्या मंत्र्याने मात्र काँग्रेसवर शेतकऱ्यांना हिसेंसाठी भडकवल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर शेतकऱ्यांना भडकवण्याचा गंभीर आरोप केला आहे.
भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि यश वाढत आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्टांची लोकप्रियता आणि यश घटत आहे. त्यांना राजकीय घराण्यांची चिंता आहे. लोकांनी त्यांना नाकारलं आहे. मात्र, तीच काँग्रेस अहंकारात लोकांना भडकवण्याचं काम करत असल्याचा आरोप जावडेकर यांनी केला आहे.
निवडणुकीत जे पराभवी झाले आहेत ते देशभरात एकत्र येवून देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. 26 जानेवारीला काँग्रेस अशाप्रकारे शेतकऱ्यांना भडकवू शकते, यावरुन काँग्रेस कोणत्या थरावर आली आहे, हे लक्षात येते, अशी टीका जावडेकरांनी केली आहे. यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांचे देखील कौतुक केले.
Read Also :
- ‘महाविकास आघाडीचा गोंधळ पाहता…’, दिल्ली मेट्रोत बसून फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा
- … त्यानंतरच चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा विचार करू – वर्षा गायकवाड
- विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह काँग्रेसच्या मार्गावर
- दिल्लीतील हिंसाचारानंतर मायावतींनी केंद्र सरकारला केले हे आवाहन, म्हणाल्या…
- ‘राजकारणासाठी ही व्यक्ती हिंसेचे समर्थन करतेय’, भाजप नेत्याची पवारांवर टीका