मुंबई : कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची होती पण ते निष्क्रिय ठरले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतील हिंसाचारावरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता.
शरद पवारांच्या या टीकेला आता भाजप नेत्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राजकारणासाठी ही व्यक्ती हिंसेचे समर्थन करत आहे, अशी बोचरी टीका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष यांनी केली आहे.
This man was Minister in Union Govt for several decades . Look at the argument. Politics makes him support violence . https://t.co/gx0fQ00UX3
— B L Santhosh (@blsanthosh) January 26, 2021
बी एल संतोष यांनी ट्विट करत पवारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट केले की, ही व्यक्ती अनेक दशके केंद्र सरकारमध्ये मंत्री होती. त्यांचा युक्तिवाद पाहा. राजकारणामुळे ते हिंसेचे समर्थन करत आहेत.
दरम्यान, दिल्लीतील हिंसाचारावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले होते की, दिल्लीतील घटनेचं समर्थन करता येणार नाही, पण ते का घडलं हे ही लक्षात घ्यायला हवं. अजूनही केंद्राने शहाणपण दाखवावा. टोकाची भूमिका सोडावी आणि अनुकूल निर्णय घ्यावा. गेल्या अनेक वर्षांपासून शांत असेलला पंजाब पुन्हा अस्वस्थ करू नका, याचं पातक मोदी सरकारने करू नये.
Read Also :
- केंद्र सरकारचा काहीतरी वेगळाच डाव नाही ना ? दिल्लीतील हिंसाचारानंतर आदित्य ठाकरेंना शंका
- … अन् अजित पवारांनी वाचले बाळासाहेब ठाकरेंनी कारागृहातून मीनाताईंना लिहिलेले पत्र
- ‘आज तिरंगा योगी सरकार के गिरफत में है’, त्या फोटावरून काँग्रेसने साधला निशाणा
- ‘माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवारसाहेबांनी दखल घेणं हे भाग्यचं’, पवारांच्या टीकेला दरेकरांचे उत्तर
- ‘हाच बळीराजा यांची सत्ता उलथवून लावेल’, अमोल मिटकरींचा मोदी सरकारवर हल्लाबोल