नवी दिल्ली : मुंबईतील मेट्रो कारशेडच्या मुद्यावरून भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. मेट्रो-3 प्रकल्पाची अनेक कामे अद्याप रखडलेली आहे. तसेच, कारशेडसाठी आता सरकार नवीन जागा शोधत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट दिल्लीतील मेट्रोतून प्रवास करताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी विमानतळावर पोहचण्यासाठी मेट्रोतून प्रवास केला. याबाबतचा फोटो देखील त्यांनी ट्विटरवर शेअर केला.
I travelled in Delhi Metro today to return back to the airport & reached in a very short span as compared to travel by road!
Don’t know when will I be able to travel in Mumbai Metro 3 to the airport, looking at the things messed up by MVA on CarShed issues 🤔#Metro #Mumbai pic.twitter.com/JKPTElbcdD— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 27, 2021
महाविकास आघाडीवर निशाणा साधत त्यांनी ट्विट केले की, मी आज दिल्ली विमानतळावर परत येताना मेट्रो रेल्वेने प्रवास केला. नेहमीच्या रस्ते मार्गापेक्षा हा प्रवास अत्यंत कमी वेळेत झाला. मुंबईत मेट्रो-3 मार्गाने मी विमानतळापर्यंत असा कधी प्रवास करु शकेन? महाविकासआघाडी सरकारने कारशेडच्या मुद्द्यावरुन घातलेला गोंधळ पाहता त्याची शाश्वती वाटत नाही, असा चिमटा त्यांनी महाविकास आघाडीला काढला.
दरम्यान, आरे येथील कारशेड कांजूरमार्गला हलविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र या जागेवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी दावा ठोकला होता. अखेर उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते.
Read Also :
- … त्यानंतरच चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा विचार करू – वर्षा गायकवाड
- विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह काँग्रेसच्या मार्गावर
- दिल्लीतील हिंसाचारानंतर मायावतींनी केंद्र सरकारला केले हे आवाहन, म्हणाल्या…
- ‘राजकारणासाठी ही व्यक्ती हिंसेचे समर्थन करतेय’, भाजप नेत्याची पवारांवर टीका
- केंद्र सरकारचा काहीतरी वेगळाच डाव नाही ना ? दिल्लीतील हिंसाचारानंतर आदित्य ठाकरेंना शंका