मुंबई : दिल्ली मेट्रोतून प्रवास करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट महाविकास आघाडीवर मुंबईतील मेट्रोवरून निशाणा साधला होता. आता या टीकेला काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी उत्तर दिले आहे.
तुम्ही ज्या मेट्रोमधून प्रवास करत आहात, त्याची सुरुवातच काँग्रेसने केली आहे, असा टोला सत्यजित तांबेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी विमानतळावर पोहचण्यासाठी मेट्रोतून प्रवास केला. त्यांनी ट्विट केले की, महाविकास आघाडीवर निशाणा साधत त्यांनी ट्विट केले की, मी आज दिल्ली विमानतळावर परत येताना मेट्रो रेल्वेने प्रवास केला. नेहमीच्या रस्ते मार्गापेक्षा हा प्रवास अत्यंत कमी वेळेत झाला. मुंबईत मेट्रो-3 मार्गाने मी विमानतळापर्यंत असा कधी प्रवास करु शकेन? महाविकासआघाडी सरकारने कारशेडच्या मुद्द्यावरुन घातलेला गोंधळ पाहता त्याची शाश्वती वाटत नाही.
Just for you info, Dear Devendra bhau, Delhi metro in which you travelled today, was started by Congress govt in Delhi, similarly Mumbai metro was also started in Congress regime, Pls be positive, we will very soon complete all phases of Mumbai Metro. https://t.co/dfsa1PEFqa
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) January 27, 2021
देवेंद्र फडणवीसांच्या या ट्विटनंतर तांबेंनी देखील ट्विट करत जोरदार उत्तर दिले. सत्यजित तांबे म्हणाले, देवेंद्रभाऊ, केवळ तुमच्या माहितीसाठी की, तुम्ही आज ज्या दिल्ली मेट्रोने प्रवास केलात ती काँग्रेस सरकारच्या काळात सुरु झाली होती. मुंबई मेट्रोही काँग्रेसच्याच कार्यकाळात सुरु झाली. त्यामुळे सकारात्मक राहा. लवकरच मुंबई मेट्रोच्या सर्व मार्गिकांचे बांधकाम पूर्ण होईल, असा टोला त्यांनी लगावला.
Read Also :
- ‘ती’ 2 नावे घेताना काहींना अॅलर्जी होते, शरद पवारांचा विखे पाटलांवर निशाणा
- ‘काँग्रेसने शेतकऱ्यांना हिंसेसाठी भडकवले’, केंद्रीय मंत्र्याचा गंभीर आरोप
- ‘महाविकास आघाडीचा गोंधळ पाहता…’, दिल्ली मेट्रोत बसून फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा
- … त्यानंतरच चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा विचार करू – वर्षा गायकवाड
- विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह काँग्रेसच्या मार्गावर