मुंबई : देशाच्या कृषी क्षेत्राला प्रचंड योगदान देणाऱ्या व सहकारी चळवळीला दिशा देणाऱ्या अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने वर्षांत विविध विषयांवर विविध चर्चासत्रे चालवावीत या संकल्पनेची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये या संकल्पनेची सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रमादरम्यान शरद पवारांकडून सहकार चळवळीवरून विखे पाटलांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.
विखे कुटुंबाकडून प्रवरा साखर कारखान्याचं श्रेय पद्मश्री विठ्ठलराव विखेंना देण्यात येते. यावरून शरद पवारांनी अप्रत्यक्ष विखे पाटलांना टोला लगावला आहे. शरद पवार म्हणाले की, देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगरमधील प्रवरा कारखानाच आहे. त्याच्या उभारणीतील पहिली दोन नावं म्हणजे अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ आणि अण्णासाहेब शिंदे ही आहेत. पण नावं घेताना काहींना अॅलर्जी होते, असा टोला त्यांनी लगावला.
शरद पवार म्हणाले की, अण्णासाहेब शिंदे आणि चव्हाण प्रतिष्ठानचा घनिष्ठ संबंध आहे. संस्थापकांच्या यादीमध्ये आपल्याला त्यांचं नाव बघायला मिळेल. सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष म्हणून काहीकाळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि विविध प्रकारच्या बैठकांना नेतृत्व देण्याचं काम त्यांनी केले.
त्यांनी अण्णासाहेबांना १९६२ साली नगर जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली व विजयी झाल्यानंतर जवाहरलाल नेहरूंना आग्रहाने सांगून कृषी खात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सुपूर्द केली. pic.twitter.com/GnRXBIV7Ye
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 27, 2021
अण्णासाहेबांना १९६२ साली नगर जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली व विजयी झाल्यानंतर जवाहरलाल नेहरूंना आग्रहाने सांगून कृषी खात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सुपूर्द केली. केंद्रात अनेक वर्षे शेती विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा व दृष्टीचा ठसा उमटवला. संशोधनाच्या क्षेत्रावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केलं व या क्षेत्रातल्या मान्यवरांना सहभागी करून घेतलं, असेही पवारांनी सांगितले.
आज शेतकऱ्यांना थंडीत ६० दिवस आंदोलन करण्याची वेळ आली. अण्णासाहेब शिंदे या कालखंडात असते तर शेतकऱ्यांवर अशी वेळ आली नसती. त्यांची संवेदना शेती व शेतकऱ्यांशी निगडित होती. आजचे राज्यकर्ते त्यातून काही शिकतील अशा प्रकारची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 27, 2021
हरितक्रांती प्रत्यक्षात आणण्याच्या उपक्रमात अखंडता आणि सातत्य अण्णासाहेबांमुळेच शक्य झालं. आज शेतकऱ्यांना थंडीत ६० दिवस आंदोलन करण्याची वेळ आली. अण्णासाहेब शिंदे या कालखंडात असते तर शेतकऱ्यांवर अशी वेळ आली नसती. त्यांची संवेदना शेती व शेतकऱ्यांशी निगडित होती. आजचे राज्यकर्ते त्यातून काही शिकतील अशी अपेक्षा असल्याचे म्हणत पवारांनी भाजपवर देखील निशाणा साधला.
Read Also :
- ‘काँग्रेसने शेतकऱ्यांना हिंसेसाठी भडकवले’, केंद्रीय मंत्र्याचा गंभीर आरोप
- ‘महाविकास आघाडीचा गोंधळ पाहता…’, दिल्ली मेट्रोत बसून फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा
- … त्यानंतरच चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा विचार करू – वर्षा गायकवाड
- विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह काँग्रेसच्या मार्गावर
- दिल्लीतील हिंसाचारानंतर मायावतींनी केंद्र सरकारला केले हे आवाहन, म्हणाल्या…