मुंबई : दिल्ली मेट्रोतून प्रवास करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट महाविकास आघाडीवर मुंबईतील मेट्रोवरून निशाणा साधला होता. महाविकासआघाडी सरकारने कारशेडच्या मुद्द्यावरुन घातलेला गोंधळामुळे मेट्रोचे काम पूर्ण होत नसल्याची टीका फडणवीसांनी केली होती. या टीकेला आता काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे.
तुमच्या सरकारला जमलं नाही ते काम आम्ही नक्कीच करु फक्त मोदी सरकाने निर्माण केलेले अडथळे दूर झाले पाहिजेत, अशा शब्दात मेट्रोच्या मुद्यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीसांना उत्तर दिले आहे.
And Sir,
Kanjur plot was always availableIt was your Govt that messed up by doing deal with Shapoorji Pallonji bldrs
It was your Govt that favoured private builder over public Metro
If you want to look for someone to blame for this mess, do look into the mirror 🙏
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 28, 2021
सचिन सावंत म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात निर्माण झालेल्या दिल्ली मेट्रोचं तुम्ही कौतुक केलं याचं समाधान आहे. मुंबईमध्येही जी एकमेव मेट्रो सेवा पूर्ण झाली आहे ती सुद्धा आघाडी सरकारच्या काळात झालीय. तुमच्या सरकारला 2019ची डेडलाइन पाळता आली नाही. महाविकास आघाडीला प्रशासकीय कामांचा प्रदीर्घ अनुभव असून तुमच्या सरकारला जमलं नाही ते काम आम्ही नक्कीच करु, फक्त मोदी सरकाने निर्माण केलेले अडथळे दूर झाले पाहिजेत.
कांजूर येथील जमीन उफलब्ध होती. मात्र तुमच्या सरकारने तिथे गोंधळ घालून जागेचा सौदा शापुरजी पालोनजी बिल्डर सोबत केला. तुमच्या सरकारने खासगी बिल्डरला सार्वजनिक मेट्रोपेक्षा अधिक झुकतं माप दिलं. तुम्हाला या मेट्रोच्या गोंधळासाठी कोणाला दोष द्यायचा असेल तर तुम्ही आरशात पहा, असा चिमटा देखील सावंतांनी काढला.
Read Also :
- वर्षभरात बालभारती स्वतःचे शैक्षणिक चॅनेल सुरु करणार, शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती
- ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारानंतर दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार
- भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख ? गृहमंत्र्यांचा कारवाईचा इशारा
- पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला लवकरच मिळणार मान्यता, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे आश्वासन
- ‘…तेव्हा आशिष शेलार तुम्ही झोपले होते का ?’ पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचे पुराव्याने उत्तर