नागपुर : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलाच हिवाळी अधिवेशन नागपुर याठिकाणी होत आहे. या अधिवेशनात विरोधक शिंदे-फडणवीस सरकारला जोरदार घेरण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी शिंदे सरकारमधील २० मंत्र्यांसाठी नागपुर येथील जवळपास ४६ बंगले तयार ठेवण्याची सुचना देण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या अगोदर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“आरोग्य मंत्र्यांना जिल्हा संभाळता येत नाही, राज्य कसे संभाळणार”?
अनेक वर्षापासून नागपुर याठिकाणी अधिवेशन घेण्याची मागणी केली जात होती. मात्र मागील तीन वर्षापासून मुंबईलाचा अधिवेशन पार पडत होतं. मात्र यावर्षी नागपुर याठिकाणी १९ डिसेंबर पासून अधिवेशन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याची तयारी विरोधकांनी देेखील केली आहे. त्यासाठी अलिकडेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विरोधी पक्षांची बैठक पार पडली. ज्या पद्धतीने विरोधकांनी विधानसभेत मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा ५० खोके एकदम ओक्के अशा घोषणा प्रचलित झाल्या. त्यामुळे नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात देखील मोठा गोंधळ माजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“मातोश्री 2 कशी झाली ? 126 कोटी बापाकडे अन् 11 कोटी पोरांकडे कसे आलेत ?” मनसेचा सेनेला सवाल
सध्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात २० मंत्री असून नागपुर येथील हिवाळी अधिवेशनापुर्वी तब्बल ४६ बंगले तयार ठेवण्याची सुचना देण्यात आली आहे. त्यानुसार नागपुर येथील नागभवन आणि रवीभवन परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाला बंगल्यांची डागडुजी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. रवीभवनाच्या परिसरात ३० तर नागभवनाच्या परिसरात १६ बंगले आहेत.
“घरच्या कार्यक्रमाला जायला निमंत्रण कशाला लागते”; शिवेंद्रसिंह राजे
दरम्यान, जर हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वी मंत्रीमंडळाच्या विस्तार झाला तर जास्त बंगले तयार ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. शिंदेंच्या मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यात आता कुणाला संधी मिळणार त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे. पहिल्या मंत्रीमंडळाच्या विस्तार एकाही अपक्ष, तसेच महिलेला स्थान देण्यात आलं नव्हतं. यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर कडाडून टिका केली होती. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यात अपक्षांसोबत महिलांना देखील स्थान देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- “..तर आता माझ्यावर पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील”; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट
- “मादर** संजय राऊत, तु यापुढे अशी भाषा वापरू नको”; बंडखोर आमदाराची जीभ घसरली*
- “महाराष्ट्र द्वेषी शिंदे- फडणवीस सरकार महाराष्ट्रातून लवकरच हद्दपार करा”
- “ठाकरेंनी संजय राऊत या पोपटाचे तोंड बंद केलं पाहिजे, नाहीतर उरलेली जनताही निघून जाईल”
- “कार्यकर्त्यांवर कारवाई होते मग कोश्यारींवर कारवाई का नाही”; संभाजी राजेंचा सवाल