ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांवर एका सार्वजनिक कार्यक्रमात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यानी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आव्हाडांना पोलिसांनी एक रात्र तुरूंगात ठेऊन त्यांना दुसऱ्या दिवशी जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यातच आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाणे महानगरपालिकेतील काही कामांचा शुभारंभ करणार आहे. त्यासाठी जितेंद्र आव्हाडांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यावर खोचक ट्विट करत कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
“मातोश्री 2 कशी झाली ? 126 कोटी बापाकडे अन् 11 कोटी पोरांकडे कसे आलेत ?” मनसेचा सेनेला सवाल
आव्हाडांनी आपल्या ट्विट मध्ये असं म्हटलं आहे की, आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे. आमंत्रण दिले आहे मला महापालिकेनी. पण ब्रिजच्या उद्घाटनात त्यांच्या 8 फुट अंतरावर माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल झाला. ते स्वत साक्षीदार आहेत. आज त्यांच्या बाजूला उभा राहिन आणि पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा करतील. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“घरच्या कार्यक्रमाला जायला निमंत्रण कशाला लागते”; शिवेंद्रसिंह राजे
तसेच पुढे ते असे म्हणाले की, त्या पेक्षा कार्यक्रमाला न गेलेले बरं. परत पोलीस म्हणतील दबाव होता आणि सीएम म्हणतील तुला माहित आहेना मी हे करू शकत नाही. तुला कस कळत नाही. खरचं कळत नाही. चलो ये वक्त भी गुजर जायेगा. u too brutas असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी नाराजी व्यक्त करत कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे आमंत्रण दिले महापालिकेनी पण ब्रिज च्या उद्घाटनात त्यांच्या ८ फूट अंतरावर
माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल झाला ते स्वतः साक्षीदार आहेत आज त्यांच्या बाजुला उभा राहीन आणि पोलिस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील …— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 3, 2022
Read also
- “मादर** संजय राऊत, तु यापुढे अशी भाषा वापरू नको”; बंडखोर आमदाराची जीभ घसरली*
- “महाराष्ट्र द्वेषी शिंदे- फडणवीस सरकार महाराष्ट्रातून लवकरच हद्दपार करा”
- “ठाकरेंनी संजय राऊत या पोपटाचे तोंड बंद केलं पाहिजे, नाहीतर उरलेली जनताही निघून जाईल”
- “कार्यकर्त्यांवर कारवाई होते मग कोश्यारींवर कारवाई का नाही”; संभाजी राजेंचा सवाल
- “आरोग्य मंत्र्यांना जिल्हा संभाळता येत नाही, राज्य कसे संभाळणार”?