दिल्ली : दिवाळी जवळ येत असताना आता एकामागून एक राज्य फटाके बंदीचा निर्णय घेत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी फटाकेबंदीचा निर्णय घेतल्यानंतर आता ओडिशा, सिक्कीम, दिल्लीनंतर कर्नाटक सरकार सरकारने हि फटाकेबंदीचा निर्णय घेतला आहे दिवाळी काळात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणाला रोखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
दरवर्षी शाळा महाविद्यालयांतून आणि विविध सामाजिक संस्थांमार्फत फटाक्यांविरूद्ध प्रबोधन मोहीम राबविली जाते. त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत. यावर्षी मात्र करोनाच्या संकटामुळे या मोहिमेला अधिक जोर आल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आता राजकीय क्षेत्रातील मंडळीही यामध्ये सहभागी होत आहे. मात्र, करोनाचे संकट असले तरी यावर्षीही फटाके विक्रेत्यांना पूर्वीच परवाने देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदीही झाली असून विक्रीलाही सुरवात झाली आहे.
दरम्यान दिवाळी जवळ आल्याने सध्या फटक्यांवरील बंदीची चर्चा सुरू आहे. दरवर्षीची फटाक्यांवरील बंदीची अशीच चर्चा होते. यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर ती जोरकसपणे केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही फटाक्यांचा वापर मर्यादित करावा, असे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. त्यानंतर आता युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी थेट बंदीचीच मागणी केली आहे.
Read Also :
लपून उत्तर काय उत्तर देता? चर्चेला कुठेही बोलवा, मी तयार, शेलारांचं आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान
केंद्र सरकारच्या कृषी विधेयका विरोधात अमरावतीत काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा
‘त्याच दिवशी मी शपथ घेतलेली, अर्णबला सोडणार नाही’
रोहित पवारांच्या यशासाठी ‘मातोश्रीं’नी कसली कंबर; ‘सुनंदा पवार’ उतरल्या मैदानात