अमरावती : केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी असून, हे काळे कायदे तात्काळ केंद्र सरकारने मागे घ्यावे. यासाठी अमरावतीत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला. पोलिसांनी लावलेले बॅरिकेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.
मोदी सरकारने शेतकऱ्यावर लादलेले काळे कायदे रद्द करण्यासाठी @INCIndia @INCMaharashtra द्वारा आयोजीत तथा जनतेचा आणि बळीराजाच्या पाठिंब्याने आज किसान बचाव ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झाले.शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही कॉंग्रेसजन स्वस्थ बसणार नाही. जय जवान,जय किसान @RahulGandhi pic.twitter.com/KnEPlLpQL7
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) November 5, 2020
यावेळी आंदोलन व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. यात मोठ्या प्रमाणावर तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अमरावतीत निघालेल्या ट्रॅक्टर मोर्चाने शहर दणाणून गेले होते यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना काँग्रेसने निवेदन देऊन केंद्र सरकारने लागू केलेले कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तर या विधेयकावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
Read Also :
‘त्याच दिवशी मी शपथ घेतलेली, अर्णबला सोडणार नाही’
रोहित पवारांच्या यशासाठी ‘मातोश्रीं’नी कसली कंबर; ‘सुनंदा पवार’ उतरल्या मैदानात