बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यात सोयाबीन पिकांची पाहणी केली. शेतकरी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. यावेळी पिकांवर कीड आली आहे. अशा स्थितीत शेतकरी हवालदील झाला आहे. पिकांचे नुकसान होत आहे. अशा स्थितीत कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी माहिती घेऊन पंचनामे करण्यासाठी बांधावर हवे होते. प्रारंभी उगवणीची समस्या होती. त्यानंतर कीडरोगांचा त्रास आहे. याबाबत शेतकरी वर्गात जनजागृती केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
यासंदर्भात कृषीमंत्री भुसे म्हणाले, राज्यमंत्री कडू यांच्या भावना रास्त आहेत. त्याची दखल आम्ही घेतली आहे. त्याबाबत चौकशी केली जाईल. त्या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार संबंधीतांकडे विचारणा केली जाईल. त्याबाबत कारवाई होईल. त्याबाबत निश्चित रहावे अशी माहिती कृषिमंत्र्यांनी दिली.
यंदा अचानक बियाण्यांची मागणी वाढली. ती पूर्तता करताना धावपळ झाली. शेतकरी वर्गात स्वतःच्या शेतातील बियाणे वापरण्याचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. त्या तुलनेत महाबीज सारख्या शासकीय संस्थांचा बियाणे विक्रीतील सहभाग ५ ते १० टक्के एव्हढा मर्यादीत आहे. त्यामुळे कृषी विभागाने पूर्वतयारी केली असली तरीही, राज्याच्या विविध भागात बियाणे, उगवण व त्यानंतर किड या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावर काय मार्ग काढायचा याबाबत कृषी विभाग मर्यादीत मनुष्यबळासह प्रयत्नशील आहे.
Also Read This
काँग्रेस आमदारांच्या नाराजीबाबत संजय राऊत म्हणतात . .https://t.co/NswTsaInxL
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 25, 2020