पुणे – देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत पहाटे घेतलेला शपथविधी गाजलेला होता. त्यानंतर दोन्ही नेते पुणे प्रथमच पुणे महापालिकेतील सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भामा आसखेड योजनेचे उद्घाटन झालं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मीडियावर चालणाऱ्या बातम्यांवरून कोपरखळी मारली.
फडणवीस म्हणाले, “अजित पवारांसोबत एकाच मंचावर कार्यक्रम असला की आधी दोन दिवस आणि नंतर दोन दिवस बातम्या चालतात. हे नवीनच आहे”. यावर अजित पवार म्हणाले, “मी पण दोन चार दिवस पाहिलं. त्याच त्याच बातम्या दिसतात. बातम्या दाखवलाय काही नसलं की ते हे दाखवणारच”
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले “पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्कंठा नव्हती, तेवढी मीडियाला होती. आता एकत्र मंचावर येणार म्हणजे काय कुस्ती खेळणार. दादा, दोन तीन दिवसाच्या बातम्या द्यायच्या असतील तर तुम्ही मला चहाला बोलवा, किंवा तुम्ही माझ्याकडे चहाला या. विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची परंपरा आहे,
“मी आणि अजित पवार एकत्र आलो की आधी दोन दिवस आणि नंतर दोन दिवस बातम्या चालतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एखादा आमदार कामानिमित्त मंत्र्यांना भेटायला गेला की लगेच तो पक्ष सोडतोय अशा बातम्या येतात. पण याची कधीच पर्वा करायचं कारण नाही. जनतेसाठी जिथे जावं लागेल तिथे जायचं, जे काम करायचं आहे ते आपण करायचं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्कंठा नव्हती, तेवढी मीडियाला होती. आता एकत्र मंचावर येणार म्हणजे काय कुस्ती खेळणार. दादा, दोन तीन दिवसाच्या बातम्या द्यायच्या असतील तर तुम्ही मला चहाला बोलवा, किंवा तुम्ही माझ्याकडे चहाला या. विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची परंपरा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने येऊन घोषणा देऊ लागले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं. सातवर्षानंतर हा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. मात्र त्याच्या श्रेयवादावरुन भाजप युवा मोर्चा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने येऊन घोषणाबाजी देऊ लागले.