मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशानापुर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधत चहापाण्याच्या कार्याक्रमाला बहिष्कार टाकला. तसेच त्यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला.
आर्यन खानला दिलासा; चौकशी समितीकडून आली सर्वात महत्त्वाची माहिती
पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्याबाबत महत्वाचे वक्तव्य केले होते. त्यावरून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परीस्थितीतही सरकारने शेतकऱ्यांचे वीजकापणी करण्याचे काम केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुठल्याही शब्दाला किंमत राहिली नाही.
आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे गोत्यात येणार? ड्रग्झ सापडले नसल्याचा एसआयटीचा अहवाल
अजित पवारांनी मागच्या अधिवेशनात सांगितले होते की, आतापासून वीजकापणी बंद. त्यापुढच्या अधिवेशनात सांगितले की आता मी ठामपणे सांगतोय की वीजकापणी होणार नाही. परंतु सध्या तर वीज कापणी करण्याची स्पर्धा लागली आहे. गेली दोन वर्ष आस्मानी संकट आणि आता सुलतानी संकट शेतकऱ्याला झेलावं लागत आहे. यावर सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत. त्यांना यासंदर्भात माहिती द्यावीच लागणार आहे. आम्ही मागे हटणार नाहीत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिकांच्या वेळी जे केले, तेच आताही करणार; प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी राष्ट्रवादी मैदानात
दरम्यान, या अधिवेशनात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष करण्याची शक्यता आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाजपला कडक इशारा दिला आहे. कीतीही गोंधळ घाला, नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच असं जयंत पाटलांनी विरोधकांना ठणकावले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Read also:
- नेमका आताच कसंय काय बापलेकींना कंठ फुटला…; भाजपचा सुप्रिया सुळे यांना खोचक टोला
- बेवड्यांसाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे…; फडणवीसांचा अधिवेशनापूर्वी सरकारला इशारा
- ठाकरे सरकारनं दाऊदला सिंपथी ठेवणारे लोक ठेवलेत, आम्ही चहापानाला जाणार नाही – देवेंद्र फडणवीस
- ठाकरे सरकार, संजय राऊतांचे कपडे उतरावयचे होते, म्हणून नीलला अर्ज करायला लावला – किरीट सोमय्या
- कितीही गोंधळ घाला, नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच; जयंत पाटलांनी विरोधकांना ठणकावलं