मुंबई : माझ्या विचाराची आणि आकलनाची जी भूमिका होती, ती विधानसभेत मांडली आहे. त्यामुळे या विधानावर ठाम असून ज्या आमदार, मंत्र्यांनी महापुरूषांबाबत बेताल वक्तव्य केलीत, त्यांना आंदोनल करणारे विचारणार का ? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर कधीच नव्हते, असं म्हटल्यानंतर भाजपने अजित पवारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत राजीनामा देण्याची मागणी केली होती. त्यावर आज अजित पवार यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
“एक थाली के चट्टे बट्टे, खोके अन् दलबदलू मंडळींची राजधानी, सिल्लोड”, सेनेने डिवचलं
माझ्याविरोधात मागील काही दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे. त्यासाठी आंदोलन कर्त्यांचंच मला फोन आलेत. की असं असं आंदोलन तुमच्याविरोधात करण्याचं ठरवलं आहे, अन् माझ्या राजीनाम्याची मागणी करण्यास सांगितलं. असं अजित पवार म्हणाले, तसेच मला विरोधी पक्षनेते पद हे विधानमंडळातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिलं आहे. त्यामुळे माझा राजीनामा मागण्याचा भाजपला कोणताही अधिकार नाही. असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.
“जिथे शिंदे गटाचा उमेदवार असेल तिथे अधिक ताकद लावू”; भाजपचा आघाडीला सुचक इशारा
संभाजी महाराज यांचा माझ्या विधानातून कोणताही अपमान झाला नाही. याउलट भाजपच्या आमदारांनी, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, आणि इतर महापुरूषांचा वारंवार अपमान केला आहे. त्यामुळे माझे विचार मी मांडले आहेत. माझ्याविरोधात जे आंदोलन करत आहेत. त्यांनी अगोदर बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विचारावं, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
“देशात बेरोजगारीचा उच्चांक दर, मोदी सरकार सामाजिक तेढ वाढवण्यात व्यस्त”
दरम्यान, राजकीय हेतूने वातावरण तापवणं, आणि राजकीय द्वेषाने आरोप करणे, हे माझ्यासारख्या नेत्याला कदापी मान्य नाही. नव्या अध्यावयात पुराव्याच्या अधारे इतिहासात सतत नव्याने मांडणी होत असते. त्यामध्ये रामदास स्वामी, दादाजी कोंडदेव, हे इतिहास कारांनी मांडलं आणि ते महाराष्ट्राने मान्य केलं. त्यानंतरच राज्य सरकारने दादोजी कोंडदेव पुरस्कार बंद केला. असंही अजित पवारांनी आर्वजून सांगितलं.
Read also
- “फडणवीसांकडून जी 20 ची तुलना ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानासोबत”; राज्यात आणखी एक नवा वाद
- “तर दिपक केसरकरांनी 2024 मध्ये तुरूंगात जाण्याची तयारी ठेवावी”
- “2024 ला 200 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा निवडून येतील”, चंद्रशेखर बावनकुळे
- “धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात, पुढील उपचारासाठी मुंबईत हलवणार “
- “मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अशक्य, हे सरकार पडणार म्हणजे पडणारच”