मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाद- प्रतिवाद सुरू झाले आहेत. यातच शिंदे गटातील आमदार आणि कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर यांनी संजय राऊतांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. संजय राऊतांनी पुन्हा एकदा तुरूंगात जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा दिपक केसरकर यांनी राऊतांना दिला आहे. त्यावर राऊतांनी पलटवार केला आहे.
“देशात बेरोजगारीचा उच्चांक दर, मोदी सरकार सामाजिक तेढ वाढवण्यात व्यस्त”
आम्ही आमच्या पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरूंगात जायला तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे नाहीत. आम्ही तुमच्यासारखे लफंगे नाहीत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही. तुम्ही म्हणजे कायदा नाही. दिपक केसरकर मला तुरूंगात पाठवण्याची भाषा करत असतील तर 2024 साली त्यांनीही तुरूंगात जाण्याची तयारी ठेवावी. सर्व तयारी केली असा इशाराही त्यांनी दिला आहे.
“अजितदादांचा संघ-भाजपला एवढा राग का येतो?”
तसेच संभाजी महाजा यांच्यावरील वादावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात या दोन छत्रपतींचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्राला इतिहास आहे. इतर राज्यांना भूगोल आहे. तो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांंमुळे आहे, जे संभाजी महाराजांच्या अपमानावर बोंबा मारत आहेत. ते शिवाजी महाराजांच्या अपमानावर मूग गिळून का गप्प आहेत. असा सवालही त्यांनी केला आहे.
Read also
- “2024 ला 200 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा निवडून येतील”, चंद्रशेखर बावनकुळे
- “धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात, पुढील उपचारासाठी मुंबईत हलवणार “
- “मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अशक्य, हे सरकार पडणार म्हणजे पडणारच”
- “एक थाली के चट्टे बट्टे, खोके अन् दलबदलू मंडळींची राजधानी, सिल्लोड”, सेनेने डिवचलं
- “जिथे शिंदे गटाचा उमेदवार असेल तिथे अधिक ताकद लावू”; भाजपचा आघाडीला सुचक इशारा