पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सध्या वाद सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी भाजपला खोचक टोला हाणला आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
अजित पवार यांच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. काही ठिकाणी तर अजित पवार यांचे पुतळे देखील जाळण्यात आले. तसेच जोपर्यंत अजित पवार माफी मागत नाही. तोपर्यंत आमचा आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
“नारायण राणेंनी स्वत:च्या भावाचा खून केला, त्याची नार्कोटेस्ट करा, सगळं उघड होईल”
त्यावरून रविकांत वरपे यांनी भाजपला डिवचलं आहे. अजितदादांचा संघ-भाजपला एवढा राग का येतो? कारण लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला 270 कोटी रूपये दिले. आणि कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाचा कृती आराखडा तयार केला. असं म्हणत रविकांत वरपे यांनी भाजपला डिवचलं आहे.
तुम्ही यावर गप्प का ? शिल्लेक राहिलेला बाळासाहेबाचा कडवट कार्यकर्ता हे कधीच मान्य करणार नाही
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज जर धर्मवीर होते, तर मग अटक करायला अण्णाजी दत्तो व त्याचे सहकारी पुढे का आले? अण्णाजी दत्तो यांनी जीवाचे रान करून त्यांचे प्राण वाचवले का नाही? याउलट या सर्वांनी महाराजांचा छळ केला. भाजपच्या मते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे पुरस्कर्ते होते, तर मग अफजल खानाचा वकिल कृष्णाजी भास्कर कुलकर्णी कसा? आणि मग कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ने शिवाजी महाराजांच्या डोक्यावर वार का केला?असा सवालही त्यांनी केला.
अजितदादांचा संघ-भाजपला एवढा राग का येतो?
कारण लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला स्वराज्य रक्षक
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला २७० कोटी रुपये दिले, आणि
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाचा कृती विकास आराखडा तयार केला. @NCPspeaks@AjitPawarSpeaks— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) January 3, 2023
Read also
- “भाजपचा आणि खोकेबाज गद्दारांचा येणारा काळ कसा असेल”?
- “जसं अथर्वशीर्ष विषय घेतला, तसा महापुरूषांचाही अभ्यासक्रम विद्यापीठात घ्या”; भुजबळांची शिंदेंसमोरच मागणी
- जे.पी. नड्डा नंतर लगचेच योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर, चर्चांना उधान
- “भिडे वाडा मोठे स्मारक व्हावा ही भूमिका, मोदींकडूनंही त्याला दुजोरा” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- “तर त्याला नंगट मानसिकता म्हणू नये का ?” ऊर्फी जावेदवरून चित्रा वाघांची प्रश्नांची सरबत्ती, काय काय म्हणाल्या..?