पुणे : महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे आयुष्यभर वंचित, महिला, कष्टकऱ्यांसाठी झटले, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच आम्ही वाटचाल करत आहोत. नायगांवसारख्या छोट्या खेड्यातून विवाहानंतर पुण्यासारख्या शहरात त्या आल्या. समाजसुधारणेच्या आणि महिला शिक्षणाच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले. त्यांना घडवण्यात पुणे या त्यांच्या कर्मभूमीचा जेवढा वाटा आहे, तेवढाच त्यांच्या या मातृभूमी नायगांवचा देखील आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
“कंगणा, केतकी, अन् अमृता फडणवीसांचा फोटो ट्विट करत अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा”
त्यांची प्रेरणा सदैव समोर राहो यासाठी काही महिन्यांपूर्वी मंत्रालयात महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण आम्ही केले. आमच्यासह, प्रशासनाला ही तैलचित्र समाजातील वंचित आणि महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा देत राहतील. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न करू. नायगाव ते मांढरादेवी रस्त्याचे काम करण्यात येईल. हा रस्ता लाखो भक्तांसाठी महत्वाचा आहे. चौदा गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कालव्याचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल. असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं.
पुण्यातील ज्या भिडेवाड्यात पहिली महिलांसाठीची शाळा सुरु झाली तेथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणीसाठी नुकतीच आम्ही बैठक घेतली. या बैठकीत स्मारक उभारणीबाबत आठवडाभरात अहवाल देण्याचे निर्देश दिले असल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे. तसेच भिडे वाडा येथे मोठे स्मारक व्हावे ही भूमिका शासनाने घेतली असून लवकरच भूमिपूजन करायचे आहे. हे स्मारकही आधुनिक भारतातील प्रेरणास्थळ ठरणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील मन की बात कार्यक्रमात अशा वास्तूंना प्रत्येकाने भेट द्यावी आणि प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले होते.
उर्फी जावेद चित्रा वाघ यांना नडली..! “आता सगळ्यांना एकत्र या म्हणत चित्रा वाघ यांचं आवाहन”
सावित्रीबाई फुले यांनी पराभव न पत्करता अशक्यप्राय गोष्टी करून दाखविल्या. त्यांची प्रेरणा आणि ऊर्जा आजही समाजासमोर आहे. सामान्य माणसापर्यंत ही ऊर्जा पोहोचविण्यासाठी शासन आवश्यक सर्व प्रयत्न करेल. तसेच सुमारे ४ कोटी माता-भगिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटींचा निधी देण्यात आला. अनाथ बालकांसाठी मिशन वात्सल्य योजना सुरू करण्यात येत आहे. यामागे प्रेरणा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आहे. या महापुरुषांच्या विचारातून देशाला दिशा मिळणार असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केले आहे.
Read also
- “तर त्याला नंगट मानसिकता म्हणू नये का ?” ऊर्फी जावेदवरून चित्रा वाघांची प्रश्नांची सरबत्ती, काय काय म्हणाल्या..?
- आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- “नारायण राणेंनी स्वत:च्या भावाचा खून केला, त्याची नार्कोटेस्ट करा, सगळं उघड होईल”
- तुम्ही यावर गप्प का ? शिल्लेक राहिलेला बाळासाहेबाचा कडवट कार्यकर्ता हे कधीच मान्य करणार नाही
- “नाहीतर उभा महाराष्ट्र तुमच्या सारख्या औरंग्याच्या अवलादीला गाडल्याशिवाय राहणार नाही”