पुणे : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्या वादात आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस, कंगणा राणावत, केतकी चितळे यांचे फोटो पोस्ट करून चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. उर्फी जावेद ही तिच्या चित्रविचित्र फॅशन सेन्सासाठी ओळखली जाते. त्यावरून असा नांगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नसल्याचा इशारा चित्रा वाघ यांनी दिला. त्यावर उर्फी जावेदने देखील चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे हा वाद आता आणखीच चिघळला आहे.
पिंपरी चिंचवडचा बाहुबली हरपला, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट. पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. असं म्हणून सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांचा समाचार घेतला आहे.
“यापुढे महाराष्ट्रात येताना बाळासाहेब ठाकरे हे नाव पाठ करून या”; सेनेचा नड्डांवर निशाणा
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच… अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया, पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी ? उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ? किंवा त्यांना ( म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीसयांना ) मारहाणीची भाषा कराल का? नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल. अशी टिका देखील सुषमा अंधारे यांनी केली आहे.
“महाराज धर्मवीर असते तर काही लोकांनी कटकारस्थान करून औरंगजेबाच्या त्यांना स्वाधीन का केलं”
दरम्यान, आपल्या कामाची गरज म्हणून कोणचा पेहराव तसा असेल तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही पण जिथे आपण समाजात वावरतो, सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे. तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये? व्यक्तीस्वांतत्र्याचा सन्मान नं राखता, त्याचा अतिरेख करणाऱ्यांना रोखणं, हा ही धर्म नाही का? लेकी बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का ? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
Read also
- आधी लढाई पक्षासाठी नंतर आजारपणाशी दोन हात…! जेव्हा लक्ष्मण जगताप रूग्णवाहिकेतून विधानसभेत दाखल झाले..
- उर्फी जावेद चित्रा वाघ यांना नडली..! “आता सगळ्यांना एकत्र या म्हणत चित्रा वाघ यांचं आवाहन”
- 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल, यंदा तब्बल 6 राज्यात विधानसभेच्या निवडणुका
- “देवेंद्र भाऊ हा देवी देवतांचा सन्मान आहे का?” केतकी चितेळ्याच्या पोस्टवरून सुषमा अंधारेंचा सवाल
- “राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या नेत्यांना औरंगजेब चावला का?” भाजपचा खोचक सवाल