मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद टोकाला पोहचला आहे. उर्फी जावेद ही तिच्या चित्रविचित्र फॅशन सेन्सासाठी ओळखली जाते. त्यावरून असा नांगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नसल्याचा इशारा चित्रा वाघ यांनी दिला. त्यावर उर्फी जावेदने देखील चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे हा वाद आता आणखीच चिघळला आहे.
“महाराज धर्मवीर असते तर काही लोकांनी कटकारस्थान करून औरंगजेबाच्या त्यांना स्वाधीन का केलं”
आपल्या कामाची गरज म्हणून कोणचा पेहराव तसा असेल तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही पण जिथे आपण समाजात वावरतो, सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे. तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये? व्यक्तीस्वांतत्र्याचा सन्मान नं राखता, त्याचा अतिरेख करणाऱ्यांना रोखणं, हा ही धर्म नाही का? लेकी बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का ? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
अजित पवारांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या, “आता औरंगाबादचं संभाजीनगर नाही तर..”
स्त्री शिक्षित व्हावी, सक्षम व्हावी, यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अश्या लेकी अभिप्रेत होत्या का? जिथे समाज स्वास्थ्य महत्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का ? असा सवाल कर माझं आवाहन आहे की हे असे उपद्व्याप रोखण्यासाठी एक होऊ या. छत्रपतींचा आदर्श, सावित्रीचे संस्कार जपू या.खऱ्या अर्थांनं महिला सक्षमीकरणाचा जागर करू या. हा विषय वाद अथवा राजकारणाचा नक्कीच नाही तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा आहे ही फक्त माझीच नाही तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी नाही का ? असा सवालही त्यांनी केला आहे.
Read also
- 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल, यंदा तब्बल 6 राज्यात विधानसभेच्या निवडणुका
- “देवेंद्र भाऊ हा देवी देवतांचा सन्मान आहे का?” केतकी चितेळ्याच्या पोस्टवरून सुषमा अंधारेंचा सवाल
- “राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या नेत्यांना औरंगजेब चावला का?” भाजपचा खोचक सवाल
- पिंपरी चिंचवडचा बाहुबली हरपला, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
- “यापुढे महाराष्ट्रात येताना बाळासाहेब ठाकरे हे नाव पाठ करून या”; सेनेचा नड्डांवर निशाणा