औरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची काल चंद्रपुरात जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे आणि इतर भाजपचे काही पदाधिकारी उपस्थित होते. मात्र या सभेला लोकांची गर्दी अगदी तुरळक होती. यावरून शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी त्यांना टोला हाणला आहे.
“आधी राज्यपालांना पाकिस्तानात पाठवा, नंतर बाकीचं बघू”; रूपाली पाटलांनी घेतला या नेत्याचा समाचार
जे.पी. नड्डा यांचं भाषण सुरू होताच लोकांनी सभेतून काढता पाय घेतला. तसेच या सभेत अनेक खुर्च्या रिकाम्या दिसतानाचा व्हिडीओ अंबादास दानवे यांनी ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असंही म्हटलं आहे की, अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा, लोक आपले भाषण सुरू होण्यापुर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे. हे आज तुमच्याच साक्षीे जनतेने अधोरेखित करून टाकले आहे. असंही ते म्हणाले.
“केंद्रात भाजप सरकार आहे, तोपर्यंत सोमय्यांच्या माकड उड्या सुरू”
तसेच जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणे..! सर्वाधिक रिकाम्या खुर्च्या असल्याचा विक्रम पण आज भाजपच्या नावे नोंदवला गेला असावा. अशी शाब्दिक फडकेबाजीही त्यांनी केली.
अब्दुल सत्तारांचा गेम होणार..? संपत्तीप्रकरणी तब्बल 1400 पानांची तक्रार CBI कडे दाखल
त्याचबरोबर जे. पी. नड्डा यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख बाळासाहेब देवरस असा केला. त्यावरूनही दानवे यांनी त्यांच्यावर टिका केली आहे. नड्डाजी, यापुढे महाराष्ट्रात येताना बाळासाहेब ठाकरे हे नाव पाठ करून या. आज सभेत आपण त्यांचा बाळासाहेब देवरस असा उल्लेख केला. जे बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाहीत, ते त्यांच्या धगधगत्या विचारांचा वारसा काय संभाळणार? असा खोचक सवालही त्यांनी केला.
Read also
- “महाराज धर्मवीर असते तर काही लोकांनी कटकारस्थान करून औरंगजेबाच्या त्यांना स्वाधीन का केलं”
- अजित पवारांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या, “आता औरंगाबादचं संभाजीनगर नाही तर..”
- “नितेश राणेंना सोडा, अगोदर नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा”
- “हिमंत असेल तर शनिवाड्याचे नाव होळकरवाडा करा अशी मागणी राज्य सरकारला करा”; पडळकरांना आव्हान
- “संजय राऊतांच्या एकाएका वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघतं”; विनायक राऊत