मुंबई : संजय राऊतांच्या एका एका वक्तव्यावरून महाराष्ट्रातील संपुर्ण राजकीय वातावरण ढवळून निघतं. सकाळच्या ज्या काही बातम्या सुरू होतात या फक्त संजय राऊत यांच्या अग्रलेखाने सुरू होतात. असं म्हणत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपचे खासदार भागवत कराड यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“अंगावर आलात तर तुम्हालाही शिंगावर घेऊ”; राष्ट्रवादीचा कडक इशारा
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगोदर राज्यातील शिंदे सरकार पडणार असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. त्यावर बोलताना कराड म्हणाले की, काही दिवसापुर्वी असेच काही बडबड करीत होते. त्यानंतर ते तुरूंगात गेले, त्यातून ते सुटले, आता परत त्यांची अशी बडबड सुरू झाली आहे. परंतु त्या बडबडीकडे जनतेचं आता लक्ष्य नाही. तसेच संजय राऊत म्हणजे विटलेली भाजी आणि कडी आहे. अशी टिका देखील कराड यांनी केली.
शिंदे गटाचे फायर ब्रॅंड आमदार शहाजी बापूंनी घटवलं 8 किलो वजन, कारण आलं समोर
नितेश राणे यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, सत्य समोर आणायचं असेल तर रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, बाळा या सगळ्यांच्या हत्यांच्या खोलाशी जायचं असेल तर नारायण राणे यांची नार्कोटेस्ट करा. नितेश राणेंना सोडा, अगोदर नारायण राणेंची नार्कोटेस्ट केली तर अंकुश राणेला कुठे मारलं. कुठे जाळलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर येतील असा इशाराही विनायक राऊतांनी दिला आहे.
Read also
- “हिमंत असेल तर शनिवाड्याचे नाव होळकरवाडा करा अशी मागणी राज्य सरकारला करा”; पडळकरांना आव्हान
- “संजय राऊतांच्या एकाएका वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघतं”; विनायक राऊत
- “आधी राज्यपालांना पाकिस्तानात पाठवा, नंतर बाकीचं बघू”; रूपाली पाटलांनी घेतला या नेत्याचा समाचार
- “केंद्रात भाजप सरकार आहे, तोपर्यंत सोमय्यांच्या माकड उड्या सुरू”
- अब्दुल सत्तारांचा गेम होणार..? संपत्तीप्रकरणी तब्बल 1400 पानांची तक्रार CBI कडे दाखल