सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आले आहेत. महाराष्ट्रात सत्तांतराच्या वेळी ते काय झाडी, काय डोंगर या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. मात्र यावेळी चर्चेत येण्याचं वेगळचं कारण समोर आलं आहे.
“भाजपचं लक्ष्य 145 असेल तर शिंदे गट काय भाजपची धुणीभांडी करणार”?
मागील 8 दिवसापासून शहाजी बापू पाटील बंगळूरमध्ये मुक्कामी होते. याकाळात त्यांनी श्री श्री रविशंकर यांच्या आश्रममामध्ये त्यांनी उपचार घेतले आहे. तसेच पंचकर्मच्या माध्यमातून त्यांनी 8 दिवसात तब्बल 9 किलो वजन कमी केलं आहे. त्यांचे फोटो देखील समाज माध्यमांवर सध्या व्हायरल होत आहेत.
“नितेश राणेंनी आपली उंची अन् लायकी पाहून बोलावे, नाहीतर धरणातल्या पाण्याने आंघोळ घालण्यात येईल”
बंगळूर येथील 10 दिवसांच्या मुक्कमानंतर आता शहाजी बापू पाटील सांगोल्याला परतले आहेत. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात शहाजी बापू पाटलांचीही चर्चा रंगली आहे. शहाजी बापू पाटील सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोकात आले होते.
Read also
- “लोकसभेसाठी मुनगंटीवार, अन् बावनकुळेंचं नाव चर्चेत, मराठवाड्यातील 8 ही जागा भाजप लढवणार”
- “राज्यपाल महाराजांची बदनामी करत होते, तेव्हा भाजप कुठल्या बिळात होती”; राष्ट्रवादीचा सवाल
- “बारामती अजित पवारांचा पुतळा जाळला, नाशिक, पुण्यात भाजपकडून जोरदार आंदोलन”
- सोमय्या हा काही महात्मा नाही, ज्यांच्यावर भ्रष्ट्रचाराचे आरोप केले त्यांचं पुढे काय झालं?
- “संजय राऊत म्हणजे जनतेसाठी विटलेली भाजी आणि कडी”, भाजपची जोरदार टिका