मुंबई : कालच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी माझ्यात पक्षातील मंत्री माझा करेक्ट कार्यक्रम करीत आहे. त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या गटात काय घालमेल सुरू आहे. त्यांच्याच गटात दोन टोळ्या निर्माण झाल्या असून टोळी युद्ध सुरू आहे. त्यामुळे हे सरकार काही टिकणार नाही. असं वक्तव्य पु्न्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मुंबई येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल देखील केला.
आगामी काळातील निवडणुकांच्या आधी यातील अर्ध नेते भाजपमध्ये जाऊन स्वत:ला विलीन करून घेतील. तेच त्यांचं अंतिम ध्येय आहे. कारण त्यांना परत शिवसेना स्विकार नाही. तसेच त्यांचा पर्यायही नाही. दिपक केसरकरांनी आत्मपरिक्षणाची केलेली भाषा हे त्यांच्या गटाचं ऐक वैफल्य आहे. असंही सुचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
चंबू देसाई म्हणणाऱ्या भास्कर जाधवांना शंभुराज देसाईंचं जोरदार प्रत्युत्तर
सर्वोच्च न्यायालयाच्या लढाईत 16 आमदार अपात्र ठरतील, कारण कायदेशीर बाजूने आमची बाजू मजबूत आहे. हा निर्णय येण्यास विलंब होत आहे. परंतु हे लोक अपात्र ठरतील. तसेच भाजपचं आगामी विधानसभा निवडणुकीत 145 आमदाराचं लक्ष्य ठेवलं असेल तर त्यात शिंदे गट कुठे आहे. ? तर त्यांचं लक्ष्य 145 असेल तर शिंदे गटातील लोक त्यांना धुणीभांडी करायला ठेवणार का ? असा सवाल देखील त्यांनी केला. तसेच भाजपच्या पायरीवर देखील यांना उभ करीत नाहीत. ही तात्पुरती तडजोड असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Read also
- “नितेश राणेंनी आपली उंची अन् लायकी पाहून बोलावे, नाहीतर धरणातल्या पाण्याने आंघोळ घालण्यात येईल”
- ठरलं तर…! 15 महापालिका, 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल या तारखेला वाजणार..?
- “जो हरला त्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा”, अमोल मिटकरींनी थेट दिलं आवाहान
- “भुरटी लोक, बिन बुडाची पेंद्याची कुठेही जातात,”; राज ठाकरे अन् राणेंच्या भेटीवर ठाकरे गटाची जहरी टिका
- संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य..! फडणवीसांनी अजित पवारांना घेतले धारेवर