नागपूर : राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलतांना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कडाडून टिका केली. त्यातच त्यांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते, त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही. असं म्हटलं. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर टिका केली आहे.
“अभ्यासू, लढवय्या अन् सोमय्यांनाही जेरीस आणणार नेतृत्व म्हणजे..;” अंधारेंच्या परबांना कडक शुभेच्छा
छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले. धर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म यांचे रक्षण केले. त्यांना औरंगजेबाने का मारले? संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले गेले, पण त्यांनी मान्य केले नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्मासाठी हालअपेष्टा होऊन त्यांचे बलिदान झाले. त्यांच्या शरीराचे अक्षर:श तुकडे गेले. तरी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वधर्म, स्वराष्ट्राची भाषा सोडली नाही. म्हणू अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच पण ते धर्मवीरही होते, असं फडणवीसांनी सांगितले.
धरणवीर” असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये”, बावनकुळेंचा एका वाक्यात पवारांचा समाचार
“धरणवीर” असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये, असं म्हणत बावनकुळे यांनी एका वाक्यात अजित पवारांवर निशाणा साधला आहे. काल सभागृहात बोलत असतांना अजित पवार म्हणाले की, आपण महाराष्ट्रातमध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही. बाल शौर्य पुरस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते, त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही. असं अजित पवारांनी सभागृहात म्हटलं.
Read also
- “ज्यांना मंत्रिपद मिळाले नाहीत, ते आमच्यातीलच नेते माझ्याविरोधात कट रचताहेत”; सत्तारांचा मोठा गौप्यस्फोट
- चंबू देसाई म्हणणाऱ्या भास्कर जाधवांना शंभुराज देसाईंचं जोरदार प्रत्युत्तर
- “विनायक मेटेंची राहिलेली स्वप्न आम्ही पुर्ण करू”; फडणवीसांनी दिला मोठा आधार
- “सरकारमधील एक चंबू देसाई त्यांच्या तोडांचा चंबू झालाय”; भास्कर जाधवांची शंभूराज देसाईंवर खोचक टिका
- “नारायण राणे अन् राज ठाकरे यांची झालेली आजची भेट म्हणजे बुडत्याला काडाची आधार”