नागपूर : राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलतांना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कडाडून टिका केली. त्यातच त्यांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते, त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही. असं म्हटलं. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांवर टिका केली आहे.
“धरणवीर” असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये, असं म्हणत बावनकुळे यांनी एका वाक्यात अजित पवारांवर निशाणा साधला आहे. काल सभागृहात बोलत असतांना अजित पवार म्हणाले की, आपण महाराष्ट्रातमध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही. बाल शौर्य पुरस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते, त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही. असं अजित पवारांनी सभागृहात म्हटलं.
“तो धर्मांध क्रुरकर्मा औरंगजेबसुद्धा हसला, असेल तुमच्या विधानावर दादा” ; भाजपची टिका
धर्मवीर संभाजी महाराज हे आमच्या हिंदु समाजाचे स्वाभिमान, अस्मिता आहे. पण असं असतांना विरोधी पक्षनेता पद हे जनतेच्या भावना सभागृहात मांडण्यासाठी असतं. जनतेच्या भावना दुखावण्यासाठी नाही. ते जे ठासून म्हणाले की, धर्मवीर संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. आमच्या धर्मासाठी त्यांनी बलिदान दिलंय. त्याग, समर्पण केलंय. महाराजांनी मुस्लिम, धर्माचा, अन्य धर्माचा तिरस्कार केलाय. आमची ही भूमिका नाही. परंतु आमच्या धर्माच्या स्वाभिमानासाठी आयुष्य वेचलं. आमच्या धर्माची मठ मंदिरा टिकावी, त्यांनी प्रयत्न केलेत. त्यावेळी दान पुण्य केलं. असंही तुषार भोसले म्हणाले.
तसेच आमच्या धर्मासाठी त्यांनी 40 दिवस यातना सहन केल्या. परंतु त्यांनी कधीही धर्म सोडला नाही. अशा फालतु विचारांनी आमच्या महापुरूषांची बदनामी थांबवली पाहिजे. त्यामुळे अजित पवारांनी एकतर माफी मागावी, नाहीतर विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, असंही तुषार भोसले यांनी म्हटलं.
“धरणवीर” असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये !
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 31, 2022
Read also
- “स्टाईलमध्ये सिगारेट घेऊन कुणी उभा राहिला तर तो हिरो दिसतो”; फडणवीस गुरूजींनी दिले व्यसनमुक्तीचे धडे
- “अजित पवारांनी एकतर माफी मागावी, नाहीतर…”; तुषार भोसलेंचा अजित पवारांना सज्जड दम
- “गोविंद बागेत कशासाठी अन् केव्हा गेले, हे सांगायची वेळ आणू नका”; राष्ट्रवादीचा शिंदेंना इशारा
- “आमच्यासारख्या राष्ट्रभक्तावर,, मनी लाॅंड्रिंग कायद्याचा गैरवापर,” संजय राऊतांची प्रतिक्रिया
- “5 ट्रिलियन डॉलर, बुलेट ट्रेन, 24 तास वीज, त्यासाठी फक्त 15 तास शिल्लक”; राष्ट्रवादीने मोदींना डिवचलं