मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयातून सुटका करण्यात आली आहे. त्यांच्यावर 100 कोटी वसुली करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र यामध्ये कोणतेही सढळ पुरावे नसल्याने त्यांची तुरूंगातून अलिकडेच सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
“करेक्ट कार्यक्रम करू म्हणणाऱ्या अजित पवारांना फडणवीसांचा जोरदार टोला”
देशात मनी लाॅंड्रिंग कायद्याचा गैरवापर होत आहे. ज्या पद्धतीने माझ्यावर तसेच अनिल देशमुख, नवाब मलिकांवर कारवाई करण्यात आली आहे. यावरून कायद्याचा आणि सत्तेचा कशा पद्धतीने गैरवापर होतोय हे दिसून येईल. पण आम्ही कायद्याची लढाई लढून घरी परतलो. या काळात आमच्या कुटुंबावर कशी वेळ आली असेल सांगू शकत नाही. अशी वेळ शत्रूवरही येऊ नये, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.
“जर मी भाजपचा आमदार असतो तर या चौकशा लागल्या असत्या का?” राष्ट्रवादीच्या आमदाराचा सवाल
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, आमच्यासारख्या राष्ट्रभक्त कोणाला दहशतवादी वाटत असतील तर संविधानातल्या अनेक व्याख्या बदलाव्या लागतील, राज्याची सत्ता अडीच वर्ष आमच्या हातात होती. युपीएच्या काळातही आम्ही सत्ता जवळून बघितली आहे. मात्र आम्ही कधी शत्रूशीही इतक्या अमानुषपणे वागलो नव्हतो. याला लोकशाही म्हणत नाहीत. असा टोलाही त्यांनी लगावला.
Read also
- “5 ट्रिलियन डॉलर, बुलेट ट्रेन, 24 तास वीज, त्यासाठी फक्त 15 तास शिल्लक”; राष्ट्रवादीने मोदींना डिवचलं
- “होय, महाराष्ट्रात दोन शिवसेना, एक बाळासाहेबांची अन् दुसरी राष्ट्रवादीची शिवसेना”; शिंदे गटाच्या नेत्यांनी डिवचलं
- “तो धर्मांध क्रुरकर्मा औरंगजेबसुद्धा हसला, असेल तुमच्या विधानावर दादा” ; भाजपची टिका
- “2024 च्या निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असणार”; काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
- “किरीट सोमय्यांचा नव वर्षातील नवे संकल्प, या ‘पाच’ नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार”