नागपूर : राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलतांना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कडाडून टिका केली. त्यातच त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हटलं जात आहे. त्यावरून त्यांनी सभागृहात भाष्य केलं. त्यावर आता विरोधकांनी अजित पवारांवर टिका केली आहे.
सभागृहातच अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना झाप झाप झापलं, सभागृह स्तब्ध
काल सभागृहात बोलत असतांना अजित पवार म्हणाले की, आपण महाराष्ट्रातमध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही. बाल शौर्य पुरस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते, त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही. असं अजित पवारांनी सभागृहात म्हटलं.
“कर्नाटक सरकार आता महाराष्ट्राचा पाणी पळवतोय, तुम्ही काय करता?” अजित पवारांचा सवाल
अजित पवारांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर कधीच नव्हते, त्यांनी धर्माचा पुरस्कार केला नाही, असं अजित दादा म्हणतात. तो धर्मांध क्रुरकर्मा औरंगजेबसुद्धा हसला असेल तुमच्या विधानावर दादा, तुम्ही पवारांचे पुतणे असल्यासारखे बोलता कधी कधी. अशी टिका भातखळकर यांनी अजित पवारांवर केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर कधीच नव्हते, त्यांनी धर्माचा पुरस्कार केला नाही… अजित दादा.
तो धर्मांध क्रूरकर्मा औरंगजेबसुद्धा हसला असेल तुमच्या विधानावर दादा… तुम्ही पवारांचे पुतणे असल्यासारखे बोलता कधी कधी… pic.twitter.com/1CrH0p2QJg— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 31, 2022
Read also
- “2024 च्या निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असणार”; काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
- “किरीट सोमय्यांचा नव वर्षातील नवे संकल्प, या ‘पाच’ नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार”
- “करेक्ट कार्यक्रम करू म्हणणाऱ्या अजित पवारांना फडणवीसांचा जोरदार टोला”
- “जर मी भाजपचा आमदार असतो तर या चौकशा लागल्या असत्या का?” राष्ट्रवादीच्या आमदाराचा सवाल
- “प्रबोधनकारांचे विचार, अन् वर्षावर पाठीभर लिंब सापडली, कुणाला शिकवाताहेत”, शिंदेंचा टोला