नागपूर : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटचा दिवसही महाविकास आघाडीने दणाणून सोडला. महाविकास आघाडीच्यावतीने विधिमंडळच्या पायऱ्यांवर राज्यपाल तसेच भ्रष्ट मंत्री हटविण्याची मागणी करण्यात आली. राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासमोर ‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’, ‘भ्रष्ट मंत्री हटाव महाराष्ट्र बचाव’ या घोषणेच्या माध्यामातून राज्यपालांनी केलेल्या बेताल वक्तव्यांचा व सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांचा महाविकास आघाडीकडून निषेध नोंदविण्यात आला.
“दादा संधी असतांनाही पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही,” फडणवीसांनी दु:खावर मीठ चोळले
महाराष्ट्रविरोधी कुरघाड्या कर्नाटक सरकारने आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याच्या प्रयत्न सुरु केला असून यामुळे राज्याचा पाणीहिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण होणार असल्याची बाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत पॉईँट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्य सरकारच्या लक्षात आणून दिली. महाजन आयोगानुसार खानापूर तालुक्यातील ३० गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्याची शिफारस आहे. कळसा भांडुरा प्रकल्पामुळे गोव्याबरोबरच महाराष्ट्रालाही फटका बसणार आहे. महाराष्ट्रातील विर्डी प्रकल्पाला याचा फटका बसणार आहे. याचमुळे महाराष्ट्र सरकारने देखील याविरोधात न्यायालयात धाव घेणे गरजेचे आहे.
“शेवटच्या दिवशी अविश्वास ठराव आणणं म्हणजे फुसका बाॅम्ब”, बावनकुळेंनी डिवचलं
कर्नाटक सरकार भाषेबाबत गळचेपी करत असतानाच आता महाजन आयोगानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या खानापूरमधील पाणी स्वतःच्या धारवाडमध्ये वळवू पाहत आहे. महाजन आयोगाचा अहवाल हाच अंतिम असल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. तसे असल्यास कळसा भांडुरा प्रकल्पाच्या अखत्यारीत खानापूर तालुक्यातील ही गावे येतात. याचबरोबर या प्रकल्पामुळे पाणी आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होणार आहे. महाजन आयोगानुसार खानापूर तालुका हा महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहे. अशा स्थितीत कर्नाटक सरकारने कळसा – भांडुरा प्रकल्प हाती घेणे गैर असल्याचा मुद्दा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या लक्षात आणून दिला.
Read also
- “अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा, अन् बक्षिस मिळवा”; शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं
- “ईडी,सीबीआयचा विषय निघाताच यामिनी जाधव आक्रमक, भास्कर जाधवांची माघार”, सभागृह शांत
- तब्बल ४० वर्षांनंतर पिंपरी-चिंचवडच्या भूमिपूत्रांना न्याय ! प्राधिकरण बाधितांना साडेबारा टक्के परतावा प्रश्न अखेर सुटला
- मनसेची रणनिती ठरली, प्रत्येक मतदारसंघात जाहीर सभा, वक्त्यांची यादीही फायनल
- अधिवेशनानं महाराष्ट्राला नेमकं दिलं काय? ठाकरे गटाच्या आमदाराची खंत