नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशन सध्या वादळी सुरू आहे. विरोधी पक्षातील आमदारांना बोलू न दिल्याने विरोधकांकडून विधान सभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाणार आहे. या ठरावाबाबत विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र देखील देण्यात आले आहे. परंतु यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सहीच नसल्याने महाविकास आघाडीत फुट पडली आहे का? अशी चर्चा देखील सध्या रंगली आहे. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारतातील पहिल्या संविधान भवनच्या कामाला गती द्या : आमदार महेश लांडगे
विरोधकांकडून अविश्वास ठराव आणायचाच होता तर तो अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आणायला पाहिजे होता. शेवटच्या दिवशी अविश्वास ठराव आणणं म्हणजे फुसका बाॅम्ब आहे, विरोधकांचे वीस पंचवीस आमदार पुन्हा येणार आहे. 184 च्या वरती मतदान मिळतील. भावनात्मक पद्धतीने मिस अंडरस्टॅंडिंग करण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे आणि तेच हे लोक करत आहेत. असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
“..तर तुम्ही मला लग्न करण्यापासून थांबवलं असतं”, फडणवीसांनी सांगितला तो लग्नाचा किस्सा
पुढे बोलताना ते म्हणाले की, अखंड महाराष्ट्राचा विकास कसा होईल. सरकारच्या वतीने जनतेसाठी काय करता येईल. विदर्भासाठी काय करता येईल. मराठवाड्यासाठी काय केलं पाहिजे. यावर चर्चा अपेक्षित होती. तसं झालं नाही. विरोधक टाईमपास करतात. वेळ खराव करतात. विरोधक दुतर्फि भूमिका घेत आहेत. असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.
Read also
- “याबद्दल मला कुठली माहिती नाही”, अजित पवारांची नाराजी, महाविकास आघाडीत फुट
- “राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव, काळी टोपी उडवत मविआचं आंदोलन”
- “अशा मुलाला जन्म दिला ज्याने आपल्या पक्षासाठी..;” संजय राऊतांनी व्यक्त केलं दु:ख
- “शिंदे अन् फडणवीस साहेबांची जोडी ही राम लक्ष्मणाची जोडी”
- नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन, देशभरातून भावपुर्ण श्रंद्धाजली