नागपूर : राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. यावेळीही विरोधकांनी राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव अशी घोषणा देत राज्यपालांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार देखील आंदोलनात सहभागी झाले होते.
“उद्या एकनाथ शिंदे सभागृहात खाकी पॅट घालून आले, तरी आम्ही त्यांचे स्वागतच करू”; संजय राऊत
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हिवाळी अधिवेशनात देखील राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलून द्या, अशी मागणी विरोधकांनी जोर लावून धरली. यातच आज काळी टोपी उडवत विरोधकांनी राज्यपालांविरोधात घोषणाबाजी दिली.
“अब्दुल सत्तारांच्या 50 पेक्षा घोटाळ्याची प्रकरणं बाहेर येणार”
तसेच मागील अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी विरोधकांनी राज्यसरकारबद्दल घोषणाबाजी दिली. विधानभवनाच्या पायऱ्यांवरच भुखंड प्रकरणावरून, टाळ वाजवत विरोधकांनी आंदोलन केलं. तसेच अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांनी यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवरून लावून धरली.
Read also
- “अशा मुलाला जन्म दिला ज्याने आपल्या पक्षासाठी..;” संजय राऊतांनी व्यक्त केलं दु:ख
- “शिंदे अन् फडणवीस साहेबांची जोडी ही राम लक्ष्मणाची जोडी”
- नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन, देशभरातून भावपुर्ण श्रंद्धाजली
- भारतातील पहिल्या संविधान भवनच्या कामाला गती द्या : आमदार महेश लांडगे
- “..तर तुम्ही मला लग्न करण्यापासून थांबवलं असतं”, फडणवीसांनी सांगितला तो लग्नाचा किस्सा