नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशन सध्या वादळी सुरू आहे. विरोधी पक्षातील आमदारांना बोलू न दिल्याने विरोधकांकडून विधान सभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाणार आहे. या ठरावाबाबत विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र देखील देण्यात आले आहे. परंतु यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सहीच नसल्याने महाविकास आघाडीत फुट पडली आहे का? अशी चर्चा देखील सध्या रंगली आहे.
“..तर तुम्ही मला लग्न करण्यापासून थांबवलं असतं”, फडणवीसांनी सांगितला तो लग्नाचा किस्सा
मागील काही घटनांवरून सभागृहात विरोधी पक्षातील आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ बघायला मिळाला. तर अजित पवार याबद्दल काहीच भुमिका घेत नसल्याने आघाडीतील काही नेते नाराज असल्याची चर्चा देखील रंगली. त्यातच काल अध्यक्षांविरोधात काॅंग्रेसनेच अविश्वास ठरावाबाबत पत्र पाठवलं परंतु त्यावर अजित पवारांची सही नसल्याने एकच चर्चा रंगली. त्यावर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“उद्या एकनाथ शिंदे सभागृहात खाकी पॅट घालून आले, तरी आम्ही त्यांचे स्वागतच करू”; संजय राऊत
यावर विचारले असता, अजित पवार म्हणाले की, मी सभागृहात गेलो होती, मी आज सकाळी ९ वाजता गेलो, आता १२ वाजले बाहेर आलो आहे. माझ्या मते, अध्यक्षाविरोधात एक वर्षाकरीता अविश्वास ठराव आणता येता नाही, त्यामुळे मी माहिती घेऊन सांगतो, तसेच महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे पण दिसले नाहीत. आम्ही इथे होतो, प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्यावर कारवाई झाली असल्यानं ते नव्हते. जर माझी संमती असती तर माझी सही असती. याबद्दल मला कुठली माहिती नाही, असंही अजित पवार म्हणाले.
Read also
- “राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव, काळी टोपी उडवत मविआचं आंदोलन”
- “अशा मुलाला जन्म दिला ज्याने आपल्या पक्षासाठी..;” संजय राऊतांनी व्यक्त केलं दु:ख
- “शिंदे अन् फडणवीस साहेबांची जोडी ही राम लक्ष्मणाची जोडी”
- नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन, देशभरातून भावपुर्ण श्रंद्धाजली
- भारतातील पहिल्या संविधान भवनच्या कामाला गती द्या : आमदार महेश लांडगे