नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने अधिवेशनात किती लक्ष्यवेधी लावल्या. याला महत्व नाही तर त्यातून लोकांचे प्रश्न किती सुटतात, याला आपण महत्व दिलं पाहिजे. यावेळी तर १५ ते २० लक्ष्यवेधी लावण्यात आल्या. पंरतु त्यातून प्रश्न विचारल्यावर सकारात्मक उत्तरं मिळत नाही. त्याला काही अर्थ नसतं. असं म्हणत या अधिवेशनातून कुणाला काहीच मिळालं नाही, अशी खंत ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांनी टीव्ही९शी बोलतांना व्यक्त केली.
“शिंदे अन् फडणवीस साहेबांची जोडी ही राम लक्ष्मणाची जोडी”
तसेच मागील काहि दिवसापासून सभागृहात विरोधकांना बोलू दिलं जाऊ देत नव्हतं. त्यामुळे अनेकदा कामकाज तहकुब देखील करावं लागलं. या अधिवेशनात सर्व राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आपल्या मतदार संघातील लोकप्रतिनिधी प्रश्न घेऊन येतात. परंतु त्यावर न्याय मिळत नसल्याने खंत वाटते. असंही रविंद्र वायकर बोलून गेले.
नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन, देशभरातून भावपुर्ण श्रंद्धाजली
दरम्यान, अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी शिंदे गटातील मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. यातच जयंत पाटलांवर निलंबणाची देखील कारवाई करण्यात आली. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. त्यामुळे विधान सभेचं कामकाज अनेकदा तहकुब करावं लागलं.
Read also
- “दादा संधी असतांनाही पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही,” फडणवीसांनी दु:खावर मीठ चोळले
- “शेवटच्या दिवशी अविश्वास ठराव आणणं म्हणजे फुसका बाॅम्ब”, बावनकुळेंनी डिवचलं
- “याबद्दल मला कुठली माहिती नाही”, अजित पवारांची नाराजी, महाविकास आघाडीत फुट
- “राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव, काळी टोपी उडवत मविआचं आंदोलन”
- “अशा मुलाला जन्म दिला ज्याने आपल्या पक्षासाठी..;” संजय राऊतांनी व्यक्त केलं दु:ख