नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन बंड केला. त्यासाठी त्यांनी आसाम मधील थेट गुवाहाटी गाठली. एक एक आमदार शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीला गेलेत. त्यातच काही आमदारांनी आपलं भ्रष्टाचार लपवण्यासाठी शिंदे गटात गेल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर आज हिवाळी अधिवेशनात शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी भाष्य केलं. त्यावर शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव चांगल्याच भडकल्या.
“याबद्दल मला कुठली माहिती नाही”, अजित पवारांची नाराजी, महाविकास आघाडीत फुट
विधानसभेत बोलत असताना भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटलं की, आपल्या महाराष्ट्रात चाललंय काय? तुम्ही सांगा की असा एकतरी आमदार तुमच्या राजकीय प्रेरणेने प्रेरीत होऊन तुमच्याकडे गेला. यासाठी मी पन्नास नावं तुम्हाला वाचून दाखवतो. तुमचे विचार चांगले होते. स्वच्छ होते. विचारसरणी होती. ती विचारसरणी स्विकारून तुमच्याबरोबर किती गेले अन् तुमच्याकडे ईडी होती, सीबीआय होती. इन्कम टॅक्स होता. म्हणून तुमच्याकडे किती गेले? तुमच्याकडे प्रमाणिकपणा असेल, नैतिकता असेल, असं म्हटल्यावर भास्कर जाधवांच्या या वक्तव्यावर यामिनी जाधव यांनी हरकीचा मुद्दा मांडला.
“राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव, काळी टोपी उडवत मविआचं आंदोलन”
हरकीच्या मुद्यावर यामिनी जाधव म्हणाल्या की, सन्मानिय सदस्य हे माझ्यापेक्षा सिनिअर आहेत. त्यांनी महिला सदस्यांकडे हातवारे करून बोलणे हे योग्य नाही. असं म्हणत यामिनी जाधव सभागृहात उभ्या राहून बोलू लागल्या. त्यावर भास्कर जाधव म्हणाले की, अध्यक्ष महोदय, माझ्या ताईच्या जीवाला लागलं मी समजू शकतो. त्यावर ताईला मी स्पष्टपणे सांगतो की, मी तुमच्याकडे हातवारे केले नाहीत. असं म्हणत भास्कर जाधव यांनी आपलं बोलणं पुढे सुरू ठेवलं.
Read also
- तब्बल ४० वर्षांनंतर पिंपरी-चिंचवडच्या भूमिपूत्रांना न्याय ! प्राधिकरण बाधितांना साडेबारा टक्के परतावा प्रश्न अखेर सुटला
- मनसेची रणनिती ठरली, प्रत्येक मतदारसंघात जाहीर सभा, वक्त्यांची यादीही फायनल
- अधिवेशनानं महाराष्ट्राला नेमकं दिलं काय? ठाकरे गटाच्या आमदाराची खंत
- “दादा संधी असतांनाही पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही,” फडणवीसांनी दु:खावर मीठ चोळले
- “शेवटच्या दिवशी अविश्वास ठराव आणणं म्हणजे फुसका बाॅम्ब”, बावनकुळेंनी डिवचलं