मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची राजकीय समीकरणं बदलली आहेत. मुंबई महापालिकेत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीत लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसची साथ मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थावर बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी महापालिका निवडणुकांसोबत विधानसभेच्या निवडणुकीचीही रणनिती आखल्याचं समजतं आहे.
“अशा मुलाला जन्म दिला ज्याने आपल्या पक्षासाठी..;” संजय राऊतांनी व्यक्त केलं दु:ख
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून घे भरारी अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत मनसेनं केलेली आजवरची कामं आणि पक्षाची भूमिका लोकांना पटवून दिली जाणार आहे. तसचं मुंबईत एकून 36 विधानसभा मतदार संघात पक्षाची किमान एक सभा आयोजित केली जाणार असल्याचं बैठकीत ठरलं आहे.
“शिंदे अन् फडणवीस साहेबांची जोडी ही राम लक्ष्मणाची जोडी”
राज ठाकरे यांच्या उपस्थित आज शिवतीर्थावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मुंबई मनपाच्या निवडणुकीसंदर्भात आज पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत राज ठाकरेंनी बैठकीत मार्गदर्शन केलं. त्यानुसार प्रत्येक मतदार संघात एक आमची जाहीर सभा होईल आणि आमची धारणा स्वबळावर निवडणुका लढवण्याची आहे. त्या हिशोबानंच आमची तयारी सुरू आहे. सभेच्या वक्त्यांची यादीही फायनल झाली आहे. असं मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.
Read also
- अधिवेशनानं महाराष्ट्राला नेमकं दिलं काय? ठाकरे गटाच्या आमदाराची खंत
- “दादा संधी असतांनाही पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही,” फडणवीसांनी दु:खावर मीठ चोळले
- “शेवटच्या दिवशी अविश्वास ठराव आणणं म्हणजे फुसका बाॅम्ब”, बावनकुळेंनी डिवचलं
- “याबद्दल मला कुठली माहिती नाही”, अजित पवारांची नाराजी, महाविकास आघाडीत फुट
- “राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव, काळी टोपी उडवत मविआचं आंदोलन”