मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी नव्या वर्षात पुन्हा एका नवीन टार्गेट हाती घेतलं आहे. महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा निश्चय किरीट सोमय्या यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतांना त्यांनी नेहमी आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करत त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज 2022 या वर्षातील शेवटचा दिवस असून उद्या 2023 वर्ष सुरू होत असून त्यांनी नवा संकल्प हाती घेतला आहे.
“अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा, अन् बक्षिस मिळवा”; शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं
किरीट सोमय्या यांनी एक व्हिडीओ ट्विट करत म्हटलं आहे की, उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात ठाकरे परिवाराचे 19 बंगल्याचा घोटाळा बाहेर काढणार आहे. तसेच काॅंग्रेसचे नेते असलम शेख यांचे 49 स्टुडिओ, शिवसेनेचे आमदार अनिल परब यांचा साई रिसोर्ट, शिवेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर, हसन मुश्रीप, मुंबई महापालिकेचा महाघोटाळा यांचा हिशोब पुर्ण करणार असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.
“ईडी,सीबीआयचा विषय निघाताच यामिनी जाधव आक्रमक, भास्कर जाधवांची माघार”, सभागृह शांत
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतांना खासदार भावना गवळी, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, यशंवत जाधव, संजय राठोड, तसेच इतर नेत्यांवर किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत चौकशीची मागणी केली. परंतु राज्यात सत्तांतरण होऊन हे सर्व नेते शिंदे गटात सामील झाल्याने यांच्यावर बोलण्याचे आता किरीट सोमय्या टाळत आहेत. त्यामुळे यावरून सोमय्यांवर प्रखरशब्दात टिका देखील केली जाते.
उद्या पासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात
ठाकरे परिवाराचे १९ बंगले
अनिल परब
हसन मुश्रीफ
असलम खान चे स्टुडिओ
किशोरी पेडणेकर एस आर ए सदनिका
मुंबई महापालिका
यांचा घोटाळ्यांचे हिशोब पूर्ण करणार @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/DLR2ie7z1g
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 31, 2022
Read also
- “करेक्ट कार्यक्रम करू म्हणणाऱ्या अजित पवारांना फडणवीसांचा जोरदार टोला”
- “जर मी भाजपचा आमदार असतो तर या चौकशा लागल्या असत्या का?” राष्ट्रवादीच्या आमदाराचा सवाल
- “प्रबोधनकारांचे विचार, अन् वर्षावर पाठीभर लिंब सापडली, कुणाला शिकवाताहेत”, शिंदेंचा टोला
- सभागृहातच अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना झाप झाप झापलं, सभागृह स्तब्ध
- “कर्नाटक सरकार आता महाराष्ट्राचा पाणी पळवतोय, तुम्ही काय करता?” अजित पवारांचा सवाल