नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस अत्यंत वादळी ठरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खरपुस समाचार घेतला. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अनेक चिमटेही शिंदेंनी सभागृहात काढले. त्यावर तुमचे बाहेरचे किस्से सभागृहात का मांडत आहात, तुम्ही बाहेर जाऊन बोला. असं म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सभागृहातच खडसावलं. त्यामुळे सभागृह तात्पुरता एकदम स्तब्ध झाला.
अधिवेशनानं महाराष्ट्राला नेमकं दिलं काय? ठाकरे गटाच्या आमदाराची खंत
मुख्यमंत्री कसा शेतात जातो, म्हणून मला हिणवन्यात आलं. हेलिकॉप्टरमधून शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा अन् एक लाख मिळावा, असं बक्षिस लावलं. असा टोमणा मारला. अन् मी म्हणतो अडीच वर्ष बाहेर पडणारा मुख्यमंत्री दाखवा, अन् बक्षिस मिळवा, असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला हाणला. तसेच लोकांचं बक्षिस वाचावं म्हणून आम्ही थेट मुख्यमंत्रीच बदलला. तसेच लोकांना मोठं बक्षिस देऊन टाकलं. अन् त्यामुळे न्याय विदर्भाला मिळाला. असंही शिंदे यावेळी सभागृहात म्हणाले.
“दादा संधी असतांनाही पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही,” फडणवीसांनी दु:खावर मीठ चोळले
त्यानंतर, सभागृहात याआधी अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेत, त्यांच्यावर विरोधक कडाडून टिका करीत होते. परंतु सभागृहात त्यांनी हा विषय काढला नाही. मग राज्याचे इतर महत्वाचे विषय असतांना तुम्ही बिकेसीवरील भाषणांतील अनेक मुद्दे येथे मांडलेत. तुमचे बाहेर कितीही वाईट संबंध असतील ते तुम्ही बाहेर मांडा. सभागृहात महाराष्ट्र्च्या हिताचे प्रश्न मांडा. असं म्हणत अजित पवारांनी शिंदेंना खडसावलं.
Read also
- “कर्नाटक सरकार आता महाराष्ट्राचा पाणी पळवतोय, तुम्ही काय करता?” अजित पवारांचा सवाल
- “अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा, अन् बक्षिस मिळवा”; शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं
- “ईडी,सीबीआयचा विषय निघाताच यामिनी जाधव आक्रमक, भास्कर जाधवांची माघार”, सभागृह शांत
- तब्बल ४० वर्षांनंतर पिंपरी-चिंचवडच्या भूमिपूत्रांना न्याय ! प्राधिकरण बाधितांना साडेबारा टक्के परतावा प्रश्न अखेर सुटला
- मनसेची रणनिती ठरली, प्रत्येक मतदारसंघात जाहीर सभा, वक्त्यांची यादीही फायनल