नागपूर : जर मी भाजपचा आमदार असतो, तर मावळातील प्रकराणाच्या चौकशा लागल्या असत्या का ?असा सवाल माळवचे राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांनी सभागृहात केला. नागपुर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते.
विकासकामांना स्थगिती देऊन शिंदे-फडणवीस सरकारने आमच्याशी गद्दारी केली. जनतेशी गद्दारी असल्याने ती न करता त्यात राजकारण न आणता ही स्थगिती उठवा. असंही त्यांनी म्हटलं. तसेच मावळात पाच वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खुन करण्यात आला. मावळात खुन, दरोडे वाढत असून युवक व्यसनाधीन होत असताना या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची, असा त्रागा त्यांनी केला. कारण यांच्या ओठात एक पोटात दुसरंच असून त्यांच्याकडून फक्त सुडाचे राजकारण सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं.
मनसेची रणनिती ठरली, प्रत्येक मतदारसंघात जाहीर सभा, वक्त्यांची यादीही फायनल
दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले की, हे खरचं जनतेचं सरकार असेल, तर त्यांनी या मंजूर निधीपैकी निम्मा द्यावा, मी त्यांचे आभार मानेन, किमान रस्त्यांसाठी मंजूर झालेले सत्तर, ऐंशी कोटी मिळावेत. जेणेकरून पावसाळयापूर्वी रस्त्यांची कामे होतील. अन्यथा पावसाळ्यात अपघात होऊन मृत्यू झाले, तर त्याला हे सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला.
Read also
- “प्रबोधनकारांचे विचार, अन् वर्षावर पाठीभर लिंब सापडली, कुणाला शिकवाताहेत”, शिंदेंचा टोला
- सभागृहातच अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना झाप झाप झापलं, सभागृह स्तब्ध
- “कर्नाटक सरकार आता महाराष्ट्राचा पाणी पळवतोय, तुम्ही काय करता?” अजित पवारांचा सवाल
- “अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा, अन् बक्षिस मिळवा”; शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं
- “ईडी,सीबीआयचा विषय निघाताच यामिनी जाधव आक्रमक, भास्कर जाधवांची माघार”, सभागृह शांत