मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या अजून चिघळत चालला आहे. यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला कर्नाटकात येण्यास बंदी घातली. त्यावरून शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी शंभुराज देसाई यांचा चंबू म्हणून उल्लेख करत हल्लाबोल केला आहे.
“गोविंद बागेत कशासाठी अन् केव्हा गेले, हे सांगायची वेळ आणू नका”; राष्ट्रवादीचा शिंदेंना इशारा
आपल्या राज्यातील मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला लॉक लागलं आहे. अन् कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आपल्या महाराष्ट्रातील सीमाभागातील लोकांवर अन्याय करत आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील सरकार तोंड उघडत नाही. या सरकारमधील दोन मंत्र्यांनी राणा भीम देवीच्या थाटावाटत सांगितलं, की आम्ही कर्नाटकला जाणार. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम दिला. त्यात चंद्रकांत पाटलांचा सारखा मजबुत मंत्री अन् एक चंबू देसाई त्यांच्या तोडांचा चंबू झाला. सकाळ संध्याकाळ शिवसेनेवर बोलणारे चंबू त्यांचा कर्नाटकबाबतीत तोंडाचा चंबू झाला आहे. अशी टिका भास्कर जाधव यांनी केली आहे.
“आमच्यासारख्या राष्ट्रभक्तावर,, मनी लाॅंड्रिंग कायद्याचा गैरवापर,” संजय राऊतांची प्रतिक्रिया
महाविकास आघाडीचा कामकाज काही दिसत नाही. तसेच आम्हालाही खुप काही बोलता येतं, परंतु शिंदे साहेबांनी आम्हाला काही सुचना दिल्या आहेत. ती आपली संस्कृती नाही. त्यामुळे येणाऱ्या आगामी निवडणुकीत त्यांची काय परिस्थिती होणार आहे. याची त्यांनी चिंता करावी, असा खोचक टोला शंभूराज देसाई यांनी भास्कर जाधव यांना लगावला आहे.
Read also
- “नारायण राणे अन् राज ठाकरे यांची झालेली आजची भेट म्हणजे बुडत्याला काडाची आधार”
- “अभ्यासू, लढवय्या अन् सोमय्यांनाही जेरीस आणणार नेतृत्व म्हणजे..;” अंधारेंच्या परबांना कडक शुभेच्छा
- धरणवीर” असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये”, बावनकुळेंचा एका वाक्यात पवारांचा समाचार
- “स्टाईलमध्ये सिगारेट घेऊन कुणी उभा राहिला तर तो हिरो दिसतो”; फडणवीस गुरूजींनी दिले व्यसनमुक्तीचे धडे
- “अजित पवारांनी एकतर माफी मागावी, नाहीतर…”; तुषार भोसलेंचा अजित पवारांना सज्जड दम