मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना यावर्षी मुहर्त लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला तिन पक्ष एकत्रित असलेल्या महाविकास आघाडीची कडी टक्कर बसणार आहे. त्यामुळे यावर्षी निवडणुकांची मोठी रणधुमाळी बघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“विनायक मेटेंची राहिलेली स्वप्न आम्ही पुर्ण करू”; फडणवीसांनी दिला मोठा आधार
कोरोना महामारीमुळे पाच महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तर तत्कालीन महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतांना महापालिकांच्या प्रभाग संख्येत आणि जिल्हा परिषदांच्या सदस्य संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी यामध्ये बदल केलेत. त्यांनी आघाडीचा हा निर्णय रद्द ठरवला. त्यामुळे याविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्याचा निकाल लवकरच लागणार असून यावर्षी जुनच्या आधी निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“सरकारमधील एक चंबू देसाई त्यांच्या तोडांचा चंबू झालाय”; भास्कर जाधवांची शंभूराज देसाईंवर खोचक टिका
राज्यात सध्या 15 महापालिका, 25 जिल्हा परिषदच्या निवडणुका रखडल्या आहेत. 2020 मध्ये औरंगाबाद, नवी मुंबई, कोल्हापुर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली यांची मुदत संपली होती. त्यानंतर मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापुर, अमरावती, अकोला, नागपूर, येथील महापालिकांची मुदत फेब्रुवारीमध्ये संपली होती.
“नारायण राणे अन् राज ठाकरे यांची झालेली आजची भेट म्हणजे बुडत्याला काडाची आधार”
तसेच 2022 च्या मार्चमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापुर, कोल्हापुर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, येथील महापालिकांची मुदत संपली. त्यामुळे या सर्व निवडणुका आता जुनच्या अगोदर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- “जो हरला त्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा”, अमोल मिटकरींनी थेट दिलं आवाहान
- “भुरटी लोक, बिन बुडाची पेंद्याची कुठेही जातात,”; राज ठाकरे अन् राणेंच्या भेटीवर ठाकरे गटाची जहरी टिका
- संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य..! फडणवीसांनी अजित पवारांना घेतले धारेवर
- “ज्यांना मंत्रिपद मिळाले नाहीत, ते आमच्यातीलच नेते माझ्याविरोधात कट रचताहेत”; सत्तारांचा मोठा गौप्यस्फोट
- चंबू देसाई म्हणणाऱ्या भास्कर जाधवांना शंभुराज देसाईंचं जोरदार प्रत्युत्तर