बुलढाणा : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीस की स्वराज्य रक्षक यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट विरोधकांना आव्हान दिलं आहे. त्यामुळे हा वाद आणखीच चिघळत चालला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“सरकारमधील एक चंबू देसाई त्यांच्या तोडांचा चंबू झालाय”; भास्कर जाधवांची शंभूराज देसाईंवर खोचक टिका
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात यावरून भाष्य केले होते. छत्रपती संभाजी महाराज हे कधीही धर्मवीर नव्हते. ते स्वराज्य रक्षक होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल जाणूनबुजून धर्मवीर सांगितलं जात आहे. असं म्हटल्यानंतर राज्यातील सत्ताधारी पक्षातील आमदारांनी त्यांच्यावर टिका केली आहे.
“नारायण राणे अन् राज ठाकरे यांची झालेली आजची भेट म्हणजे बुडत्याला काडाची आधार”
या प्रकरणावरून मिटकरींनी थेट आव्हानच दिलं आहे. संभाजी राजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर? यावर सत्ताधारी आमदारांनी माझ्यासमवेत वादविवाद करावा, यात जो हरला त्याने पदाचा राजीनामा द्यावा, असं थेट आव्हानच त्यांनी दिलं आहे. राष्ट्रवादीचे बुलढाणा तालुका अध्यक्ष दत्तात्रय लहाने यांनी आयोजित केलेल्या महापुरूष सन्मान यात्रेचा समारोप देऊळघाट येथे जाहीर सभेत ते बोलत होते.
“अभ्यासू, लढवय्या अन् सोमय्यांनाही जेरीस आणणार नेतृत्व म्हणजे..;” अंधारेंच्या परबांना कडक शुभेच्छा
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांचे धर्मवीर म्हणून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजप आणि तत्सम संघटना करत आहे. जे महापुरूषांचा अपमान करतात. त्यांना संभाजी राजेंवर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. आजकाल राजकीय नेत्यांचा धर्मवीर ही पदवी लावण्यात येते. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते असे म्हणून शिंदे गटातील आमदार स्वत:ची तुलना त्यांच्यासमवेत करण्याचा केविलपणा प्रयत्न करीत आहे. यावर कळस म्हणजे, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे देखील स्वत: ला धर्मवीर म्हणवून घेतात. अशी टिका देखील त्यांनी केली आहे.
Read also
- “भुरटी लोक, बिन बुडाची पेंद्याची कुठेही जातात,”; राज ठाकरे अन् राणेंच्या भेटीवर ठाकरे गटाची जहरी टिका
- संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य..! फडणवीसांनी अजित पवारांना घेतले धारेवर
- “ज्यांना मंत्रिपद मिळाले नाहीत, ते आमच्यातीलच नेते माझ्याविरोधात कट रचताहेत”; सत्तारांचा मोठा गौप्यस्फोट
- चंबू देसाई म्हणणाऱ्या भास्कर जाधवांना शंभुराज देसाईंचं जोरदार प्रत्युत्तर
- “विनायक मेटेंची राहिलेली स्वप्न आम्ही पुर्ण करू”; फडणवीसांनी दिला मोठा आधार