मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपने अजित पवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे, ठाणे आणि बारामती भाजपने अजित पवार यांचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त केला आहे. यावरून राष्ट्रवादीचे युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी भाजपवर कडाडून टिका केली आहे.
ठरलं तर…! 15 महापालिका, 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल या तारखेला वाजणार..?
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास संभाजी बिग्रेज यांनी सांगितला. त्यावेळी ही भाजपाई लोकांना त्रास झाला आणि आज अजित पवार यांनी संभाजी महाराज यांची खरी ओळख स्वराज्यरक्षक आहे असं सांगितले तर भाजपच्या लोकांना त्रास होत आहे. जेम्स लेन या पुस्तकाच्या वेळी, हर हर महादेव या चित्रपटाच्या वेळी, राज्यपाल बदनामी करतात त्यावेळू मूग गिळून बसणारे तुम्ही आज आंदोलन करत फिरत आहे. असा टोला देखील त्यांनी लगावला.
“जो हरला त्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा”, अमोल मिटकरींनी थेट दिलं आवाहान
तुम्ही पसरवत असलेला विकृत इतिहास थांबवण्यासाठी अजित पवार प्रयत्न करत आहेत. भाजपाई लोकांनी कितीही खरा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला तरीही याला कोणी भीक घालणार नाही. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते, आहेत आणि राहणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Read also
- “बारामती अजित पवारांचा पुतळा जाळला, नाशिक, पुण्यात भाजपकडून जोरदार आंदोलन”
- सोमय्या हा काही महात्मा नाही, ज्यांच्यावर भ्रष्ट्रचाराचे आरोप केले त्यांचं पुढे काय झालं?
- “संजय राऊत म्हणजे जनतेसाठी विटलेली भाजी आणि कडी”, भाजपची जोरदार टिका
- “भाजपचं लक्ष्य 145 असेल तर शिंदे गट काय भाजपची धुणीभांडी करणार”?
- “नितेश राणेंनी आपली उंची अन् लायकी पाहून बोलावे, नाहीतर धरणातल्या पाण्याने आंघोळ घालण्यात येईल”