नाशिक : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीस की स्वराज्य रक्षक यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक आणि पुणे याठिकाणी अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. यावेळी भाजपकडून अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात येत आहे.
“जो हरला त्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा”, अमोल मिटकरींनी थेट दिलं आवाहान
नाशिक येथील आंदोलनात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ सहभागी झाल्या आहेत. यावेळी आंदोलन कर्त्यांनी अजित पवार यांचा प्रतिमात्मक पुतळा देखील जाळून निषेध व्यक्त केला आहे. तर पुण्यातील खंडोजी बाबा चौकात भाजपचं आंदोलन सुरू आहे. यावेळी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी मोठा राडा देखील केल्याचं दिसून येत आहे.
भाजपच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग या घरासमोर दारात भाजप युवा मोर्चाने मोठा राडा केला. यावेळी त्याठिकाणी देखील त्यांच्याच घरासमोर पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.
संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य..! फडणवीसांनी अजित पवारांना घेतले धारेवर
काल सभागृहात बोलत असतांना अजित पवार म्हणाले की, आपण महाराष्ट्रातमध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही. बाल शौर्य पुरस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते, त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही. असं अजित पवारांनी सभागृहात म्हटलं.
Read also
- सोमय्या हा काही महात्मा नाही, ज्यांच्यावर भ्रष्ट्रचाराचे आरोप केले त्यांचं पुढे काय झालं?
- “संजय राऊत म्हणजे जनतेसाठी विटलेली भाजी आणि कडी”, भाजपची जोरदार टिका
- “भाजपचं लक्ष्य 145 असेल तर शिंदे गट काय भाजपची धुणीभांडी करणार”?
- “नितेश राणेंनी आपली उंची अन् लायकी पाहून बोलावे, नाहीतर धरणातल्या पाण्याने आंघोळ घालण्यात येईल”
- ठरलं तर…! 15 महापालिका, 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल या तारखेला वाजणार..?