पुणे : सत्ताधारी पक्ष तसेच त्यांच्याशी निगडित व्यक्तींकडून महापुरुषांचा सातत्याने अपमान होतो आहे. फक्त मतांच्या राजकारणासाठी वंदनीय महापुरुषांचा वापर त्यांनी केला आहे. यावर हडपसर चे दमदार आमदार चेतन विठ्ठल तुपे यांनी विधानसभेत आवाज उठवला. विधानसभेत आवाज उठवला.
“संजय राऊत म्हणजे जनतेसाठी विटलेली भाजी आणि कडी”, भाजपची जोरदार टिका
छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले? भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल स्मारकाचे काय झाले?. हा शिंदे फडणवीस सरकारला सवाल केला. निवडणूक आली की महापुरुषांचे स्मरण करायचे आणि सत्ता मिळताच त्यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचे हे सत्ताधाऱ्यांनी ठरवले आहे. पुण्यातील भिडे वाडा येथील मुलींची पहिली शाळा सुरू झाली त्याचेदेखील लवकर राष्ट्रीय स्मारक होणे गरजेचे आहे. याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सातत्याने लावून धरली आहे.
“भाजपचं लक्ष्य 145 असेल तर शिंदे गट काय भाजपची धुणीभांडी करणार”?
वंचितांचा आवाज आपल्या साहित्यातून मांडणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक साकारण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी उपलब्ध करून दिला. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सुरू झालेले पुण्यातले लोकशाहीरांचे स्मारक पूर्ण करण्यात यावे. राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने वंदनीय महापुरुषांचा अपमान, त्यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“नितेश राणेंनी आपली उंची अन् लायकी पाहून बोलावे, नाहीतर धरणातल्या पाण्याने आंघोळ घालण्यात येईल”
दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले की, सक्षम विरोधक म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने याचा विरोध करत आहोत. परंतु संसदीय मार्गाने आम्ही करत असलेल्या विरोधाला दुबळेपणा समजण्याची गल्लत सत्ताधाऱ्यांनी करू नये. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी ही म्हण लक्षात ठेवत अंगावर कुणी आल्यास आम्हीही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला.
Read also
- शिंदे गटाचे फायर ब्रॅंड आमदार शहाजी बापूंनी घटवलं 8 किलो वजन, कारण आलं समोर
- “लोकसभेसाठी मुनगंटीवार, अन् बावनकुळेंचं नाव चर्चेत, मराठवाड्यातील 8 ही जागा भाजप लढवणार”
- “राज्यपाल महाराजांची बदनामी करत होते, तेव्हा भाजप कुठल्या बिळात होती”; राष्ट्रवादीचा सवाल
- “बारामती अजित पवारांचा पुतळा जाळला, नाशिक, पुण्यात भाजपकडून जोरदार आंदोलन”
- सोमय्या हा काही महात्मा नाही, ज्यांच्यावर भ्रष्ट्रचाराचे आरोप केले त्यांचं पुढे काय झालं?