मुंबई : भाजपनेते किरीट सोमय्यांनी नवीन वर्षाच्या पुवसंध्याला पाच नेत्यांची नावं घेतली आहे. येणाऱ्या नवीन वर्षात या पाच नेत्यांच्या भ्रष्टाचारांची प्रकरण उजेडात आणणार असल्याचा संकल्प किरीट सोमय्यांनी ठेवला आहे. यावरून आता शिवसेनेकडून त्यांच्यावर कडाडून टिका करण्यात येत आहे.
“बारामती अजित पवारांचा पुतळा जाळला, नाशिक, पुण्यात भाजपकडून जोरदार आंदोलन”
किरीट सोमय्या यांनी एक व्हिडीओ ट्विट करत म्हटलं आहे की, नवीन वर्ष सुरू होणाऱ्या नवीन वर्षात ठाकरे परिवाराचे 19 बंगल्याचा घोटाळा बाहेर काढणार आहे. तसेच काॅंग्रेसचे नेते असलम शेख यांचे 49 स्टुडिओ, शिवसेनेचे आमदार अनिल परब यांचा साई रिसोर्ट, शिवेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर, हसन मुश्रीप, मुंबई महापालिकेचा महाघोटाळा यांचा हिशोब पुर्ण करणार असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.
सोमय्या हा काही महात्मा नाही, ज्यांच्यावर भ्रष्ट्रचाराचे आरोप केले त्यांचं पुढे काय झालं?
केंद्रात भाजप सरकार आहे तोपर्यंत याच्या माकड उड्या सुरू आहे. केंद्रातील भाजप सरकार गेले तर हा परत गायब होईल. एवढं नक्की असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या शिल्पा बोडके यांनी किरीट सोमय्यांवर जोरदार टिका केली आहे.
“संजय राऊत म्हणजे जनतेसाठी विटलेली भाजी आणि कडी”, भाजपची जोरदार टिका
दरम्यान, किरीट सोमय्या हा काही महात्मा नाही. जोपर्यंत त्यांनी आतापर्यंत ज्यांच्यावर आरोप केले आहेत. अन् ते तुमच्या पक्षात गेले त्यांचं काय झालं? ते अगोदर किरीट सोमय्यांनी सांगावं. असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सोमय्यांना खडसावून सांगितलं आहे.
केंद्रात भाजपा सरकार आहे तो पर्यंत याच्या माकड उड्या सुरू आहे केंद्रातील भाजपा सरकार गेले तर हा परत गायब होईल एवढ नक्की..! pic.twitter.com/eYDCoqqIIj
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) January 1, 2023
Read also
- अब्दुल सत्तारांचा गेम होणार..? संपत्तीप्रकरणी तब्बल 1400 पानांची तक्रार CBI कडे दाखल
- “अंगावर आलात तर तुम्हालाही शिंगावर घेऊ”; राष्ट्रवादीचा कडक इशारा
- शिंदे गटाचे फायर ब्रॅंड आमदार शहाजी बापूंनी घटवलं 8 किलो वजन, कारण आलं समोर
- “लोकसभेसाठी मुनगंटीवार, अन् बावनकुळेंचं नाव चर्चेत, मराठवाड्यातील 8 ही जागा भाजप लढवणार”
- “राज्यपाल महाराजांची बदनामी करत होते, तेव्हा भाजप कुठल्या बिळात होती”; राष्ट्रवादीचा सवाल