पुणे : छत्रपती संभाजी महाराज जर धर्मवीर होते.तर मग अटक करायला अण्णाजी दत्तो व त्याचे सहकारी पुढे का आले?अण्णाजी दत्तो यांनी जीवाचे रान करून त्यांचे वाचवले का नाही?याउलट या सर्वांनी महाराजांचा छळ केला. असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केला आहे.
“केंद्रात भाजप सरकार आहे, तोपर्यंत सोमय्यांच्या माकड उड्या सुरू”
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. त्यावरून सध्या राज्यात एक नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावरून भाजपने अजित पवार यांच्यावर या प्रकरणावरून जोरदार टिका केली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी भाजपला सवाल केला आहे.
अब्दुल सत्तारांचा गेम होणार..? संपत्तीप्रकरणी तब्बल 1400 पानांची तक्रार CBI कडे दाखल
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर असते तर अण्णाजी दत्तो यांच्यासह काही लोकांनी कटकारस्थान करून त्यांना औरंगजेबाच्या स्वाधीन का केलं? ते स्वराज्य रक्षक होते आणि त्यांनी रयतेचं बहुजनांच्या स्वराज्याचे रक्षण केलं म्हणूनच त्यांचा छळ केला गेला. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“अंगावर आलात तर तुम्हालाही शिंगावर घेऊ”; राष्ट्रवादीचा कडक इशारा
तसेच भाजपच्या मते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे पुरस्कर्ते होते, तर मग अफजल खानाचा वकिल कृष्णाजी भास्कर कुलकर्णी कसा? आणि मग कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ने शिवाजी महाराजांच्या डोक्यावर वार का केला. ? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच वढू बुद्रुक तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी अजितदादांनी ५०० कोटींचा निधी उपलब्ध करून स्मारकाचे काम सुरू झाले. पण छत्रपती संभाजी महाराज विषयी आकस असणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने या स्मारकाला स्थिगिती दिली. असंही त्यांनी म्हटलं आहे.
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर असते तर अण्णाजी दत्तो यांच्यासह काही लोकांनी कटकारस्थान करून त्यांना औरंगजेबाच्या स्वाधीन का केल? ते स्वराज रक्षक होते आणि त्यांनी रयतेच बहुजनांच्या स्वराज्याचे रक्षण केलं म्हणूनच त्यांचा छळ केला गेला. @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) January 2, 2023
Read also
- अजित पवारांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या, “आता औरंगाबादचं संभाजीनगर नाही तर..”
- “नितेश राणेंना सोडा, अगोदर नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा”
- “हिमंत असेल तर शनिवाड्याचे नाव होळकरवाडा करा अशी मागणी राज्य सरकारला करा”; पडळकरांना आव्हान
- “संजय राऊतांच्या एकाएका वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघतं”; विनायक राऊत
- “आधी राज्यपालांना पाकिस्तानात पाठवा, नंतर बाकीचं बघू”; रूपाली पाटलांनी घेतला या नेत्याचा समाचार