नाशिक : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीस की स्वराज्य रक्षक यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक आणि पुणे याठिकाणी अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. यावेळी भाजपकडून अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात येत आहे.
अब्दुल सत्तारांचा गेम होणार..? संपत्तीप्रकरणी तब्बल 1400 पानांची तक्रार CBI कडे दाखल
नाशिक येथील आंदोलनात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ सहभागी झाल्या आहेत. यावेळी आंदोलन कर्त्यांनी अजित पवार यांचा प्रतिमात्मक पुतळा देखील जाळून निषेध व्यक्त केला आहे. तर पुण्यातील खंडोजी बाबा चौकात भाजपचं आंदोलन सुरू आहे. यावेळी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी मोठा राडा देखील केल्याचं दिसून येत आहे.
“अंगावर आलात तर तुम्हालाही शिंगावर घेऊ”; राष्ट्रवादीचा कडक इशारा
कुठलंही कारण नसताना वादग्रस्त वक्तव्य करून समाजामध्ये वातावरण करण्याचं काम केलं आहे. मागेसुद्धा राहुल गांधी यांची कुठलीतरी रॅली आली. त्यांनीसुद्धा वि. दा. सावरकर यांचा अपमान केला. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्माच्या संरक्षणासाठी बरचं काही भोगलं. तरीही संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत. असं अजित पवार यांच्यासारख्या प्रगल्भ नेत्यानं म्हणणं योग्य नाही. असं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
शिंदे गटाचे फायर ब्रॅंड आमदार शहाजी बापूंनी घटवलं 8 किलो वजन, कारण आलं समोर
औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करा म्हणून ठरलं. शिंदे-फडणवीस यांचं सरकार आहे. ते केंद्राकडे पाठपुरावा करतील. ते नामकारण होईलसुद्धा. आता माझी अशी मागणी आहे की, औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर असं करू नका. धर्मवीर संभाजीनगर करा. असंही त्या म्हणाल्या.
Read also
- “नितेश राणेंना सोडा, अगोदर नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा”
- “हिमंत असेल तर शनिवाड्याचे नाव होळकरवाडा करा अशी मागणी राज्य सरकारला करा”; पडळकरांना आव्हान
- “संजय राऊतांच्या एकाएका वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघतं”; विनायक राऊत
- “आधी राज्यपालांना पाकिस्तानात पाठवा, नंतर बाकीचं बघू”; रूपाली पाटलांनी घेतला या नेत्याचा समाचार
- “केंद्रात भाजप सरकार आहे, तोपर्यंत सोमय्यांच्या माकड उड्या सुरू”